• Sat. Sep 21st, 2024

गुड न्यूज, वाळू खरेदी धोरणात बदल, नवं घर बांधणाऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर

गुड न्यूज, वाळू खरेदी धोरणात बदल, नवं घर बांधणाऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर

नागपूर : एका कुटुंबाला केवळ ११ ब्रास वाळू खरेदी करण्याचे बंधन राज्य शासनाने लादले होते. या धोरणात आता बदल करत हवी तेवढी रेती खरेदी करता येणार आहे. रेती खरेदी करणाऱ्या वेगवेगळ्या ग्राहकांसाठी आता विशिष्ट कोटा निर्धारित करण्यात आला आहे. याचबरोबर ६०० रुपये ब्रासप्रमाणे मिळणाऱ्या रेतीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागतील. वेगवेगळ्या डेपोवरील रेतीसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.जून २०२३मध्ये शासनाच्या नव्या धोरणानुसार नागपुरातील ११ डेपोंवरून ६०० रुपये ब्रासप्रमाणे रेतीविक्रीला सुरुवात झाली होती. मात्र, अपुरे उत्खनन आणि धोरणातील काही त्रुटींमुळे अवघ्या ४० दिवसांत रेतीडेपो बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. जिल्ह्यातील वाळूचा दर हा प्रतिब्रास ६०० रुपये होता. यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान ६० रुपये, एसआय शुल्क १६.५२ रुपये असे एकूण ६७६.५२ रुपये शुल्क होते. यात आता बदल करण्यात आला आहे. महाखनिजच्या संकेतस्थळावर नोंदणी करूनच रेती उपलब्ध होणार आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रणाली सुरू करण्यात येईल, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी सांगितले.
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास…; नाशिक महापालिकेचे ५० टक्के मनुष्यबळ निवडणूक कामात
आता मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम आराखड्यानुसार आणि महारेराच्या नोंदणी प्रमाणपत्रानुसार वाळू मिळणार आहे. डेपोनुसार वेगवेगळे दर राहणार आहे. खापा ‘अ’ या डेपोवर ८६४ रुपये आणि साहुली ‘ब’ या डेपोवर २०३० रुपये प्रती ब्रासनुसार रेती मिळेल. यात रॉयल्टीचे (स्वामित्व धन) ६०० रुपये, जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे १० टक्के, शौर्य सेवा शुल्क १६.५८ रुपये आणि पर्यावरण शुल्क २ टक्के असा समावेश होणार आहे. (१ ब्रास म्हणजे ४.५ मेट्रिक टन)
Read Latest Maharashtra News And Marathi News

सर्वसामान्य ग्राहकांसाठी ५० टक्के कोटा

पूर्वी प्रत्येकाला रेतीविक्रीचे समान धोरण होते. मात्र, आता यात बदल करण्यात आला. जिल्हास्तरीय समितीला याचे अधिकार देण्यात आले आहेत. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत चर्चा होऊन सर्वसामान्य ग्राहकांसाठी ५० टक्के, घरकुल योजनेसाठी २० टक्के, शासकीय यंत्रणेसाठी १५ टक्के आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी १५ टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी व्हायची असून लवकरच हा निर्णय अंतिम करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा; घाटीची ओपीडी रोज दोनदा, औषधी-साहित्य खरेदीवरही अंकुश

अजित पवारांनी मराठा समाजाला फसवलं, पुन्हा मुंबई गाठणार, आता माघारी परतणार नाही; मराठा समाज आक्रमक

सायंकाळी सहानंतर ‘बंद’

उत्खनन करून डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करण्यासाठी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतची वेळेची मर्यादा आहे. डेपोपासून पुढच्या वाहतुकीला कुठलेही वेळेचे बंधन नव्हते. आता महाखनिजवर संकेतस्थळावरून ईटीपी (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) सायंकाळी सहा नंतर मिळणार नाही, असा बदल करण्यात आला. रात्री रेती वाहतूक होणार नाही आणि अवैध वाळूला प्रतिबंध बसेल, हा या मागील उद्देश आहे. अवैध रेतीचा ट्रक पकडल्यानंतर पूर्वी तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात न्यावा लागत होता. मात्र, आता शासकीय वाळू डेपोवर हा ट्रक रिकामा करून महाखनिज संकेतस्थळावर त्याची नोंदणी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed