• Mon. Mar 16th, 2026

    गुंडांवर जरब बसवण्याऐवजी गृहमंत्र्यांकडून घरं फोडण्याची कामं, ठाकरेंची शाह फडणवीसांवर टीका

    गुंडांवर जरब बसवण्याऐवजी गृहमंत्र्यांकडून घरं फोडण्याची कामं, ठाकरेंची शाह फडणवीसांवर टीका

    अहमदनगर : हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पिता पुत्राचे नाव न घेता दिला आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभांचा दौरा करत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधत आहेत. विखे पाटलांच्या मतदारसंघातील राहता शहरात झालेल्या जनसंवाद मेळाव्यात ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.

    उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की यांच्या वडिलांना शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात पहिल्यांदा मंत्री केलं पण तेही ते विसरले. मात्र, जिथे सत्ता तिथे आम्ही अशी यांची सवय पण आता कुठे जाणार? कारण भाजप त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या ठिकाणी असून पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना विचारतो ते परत आले तर तुम्ही त्यांना घेणार का? मी तर त्यांना घेणारच नाही आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यावर त्यांच्या सगळ्याच भ्रष्टाचाराची चौकशी लावणार आहे. तुम्ही उतमात करत आहे तुम्हाला वाटत असेल कोणी विचारणार नाही पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात दिवस बदलत असतात आज तुम्हाला वाटतं की तुमचे दिवस आहेत पण उद्याचा दिवस हा आमचा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विखे पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी मंचावर खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, भाऊसाहेब वाकचौरे, प्रभाताई घोगरे, काँग्रेसचे सचिन चौगुले आदी उपस्थित होते.

    गृहमंत्री म्हणजे घरफोडे

    भाजपचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. पण गुंडागर्दीवर जरब बसवण्याऐवजी आमच्या राज्याचे निर्ढावलेले गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री दुसऱ्याची घरं फोडत आहेत. त्यामुळे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीऐवजी घरफोडेमंत्री असा बदल करून घ्यावा, असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांना लगावला.शिर्डी येथे वाढलेला जुलूम आणि गृहखात्याच्या निष्क्रियतेवर उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढले. ‘मला आज धक्का बसला की शिर्डीत किती जुलूम जबरदस्ती गुंडाश्रय वाढलेला आहे. ही गुंडागर्दी सरकारने संपवायला हवी. पण जसं सरकारमान्य देशी दारूचं दुकान असतं, तसं सरकारमान्य ही गुंडागर्दी असेल तर याला रोखणार कोण?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
    महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकला; …हे पाहून जीव जळतो, उद्धव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका

    तुम्हाला तुमच्या पक्षावर भरोसा नाय काय

    ‘या घरफोड्या मंत्र्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाहीत. आज अशोक चव्हाण भाजपवासी झाले. पहिल्या प्रथम संसदेत पंतप्रधानांकडून स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे प्रथमच झालं. ते काय म्हणाले की अब की बार चार सौ पार, मग चार सौ पार होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पक्षावर भरवसा नाही, तुमच्याकडे कुठले नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत?तुम्हाला इतर पक्षातील नेते घ्यावे लागतात, इथेच तुमची मानसिकता कळतेय, तुम्ही हरलेले आहात, असं ठाकरे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed