• Sat. Sep 21st, 2024
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?

मुंबई : राज्यातील काही भागांमधून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुंबईतून थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तर, पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ होताना दिसतंये. यंदा विदर्भात देखील थंडी म्हणावी तशी जाणवलेली नाही. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात थंडीचं प्रमाण कमी होत जातं. भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाचे पुणे येथील केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे. राज्यात १० आणि ११ फेब्रुवारी रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या सोबत वादळी वारे देखील वाहू शकतात. या वाऱ्यांचा वेग ३०-४० किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी विजांचा कडकडाट होत असताना सुरक्षित स्थळी थांबणं आवश्यक आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीचा जोर वाढणार, विदर्भात पावसाची शक्यता

राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात वाढ

भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महिने हिवाळ्याचे समजले जातात. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनचं राज्यातील कमाल तापमान वाढू लागलं आहे. विदर्भातही या वर्षी थंडी फार जाणवली नाही. जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विदर्भात थंडी वाढली होती. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचं प्रमाण कमी झालं असून तापमान वाढत असल्याचं चित्र आहे.

कायदा कोणीच हातात घ्यायचा नाही, फडणवीसांशी बोलणार; गणपत गायकवाड प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Weather Update : राज्यात पुढील पाच दिवसात तापमान कसं राहणार, हवामान विभागाचा अंदाज समोर, जाणून घ्या
दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईतून थंडी गायब झाली आहे. काल मुंबईतील कुलाबा येथे २०.५ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान होतं. तर, सांताक्रुझ येथे १९.२ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान होतं. दुसरीकडे पुण्यातही तापमानामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed