• Fri. Mar 13th, 2026
    जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?

    सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील होतील अशी दबक्या आवाजात चर्चा होती. यामुळे आजच्या सभेत अजित पवारांनी त्यांच्याविषयी बोलणं टाळलं असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान यावेळी सत्ता येत असते सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन महायुतीत सामील झाल्याचे त्यांनी सांगितले. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
    सत्तेला हापापलेलो नाही, सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेलो : अजित पवार
    उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, आम्ही सत्तेला हापापलेली माणसे नाहीत, सत्ता येत असते सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन महायुतीत सामील झालो. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक म्हणून चांगल्या उमेदवार देणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. विरोधक सैरभैर पळत असल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही एक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला. अरविंद केजरीवाल यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत इस्लामपूरकर, वाळवाकरांनो आपला देश सव्वा कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा आहे. अनेक जातीचे लोक आहेत. त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे.

    एक माझा उद्धव… सॉरी…एक माझा वैभव आणि मी…; भास्कर जाधव म्हणाले, मला सभा थांबवावी लागेल

    जगामध्ये देशाचे नाव गौरवाने घेतले पाहिजे. आपल्या पंतप्रधानांचा मान सन्मान परदेशात ठेवला जातो. सातत्याने ते जनतेशी संपर्कात असतात. त्यामुळे अमही विचार केला आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडमुठेपणाची भूमिका न घेता आम्ही महायुतीत सहभागी झाले. शेतकऱ्यांचे, गरीब घटक, वयोवृद्ध लोकांचे प्रश्न आम्ही सोडवत आहे. प्रत्येक गावात पक्ष मजबूत असला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार आम्ही सोडलेला नाही. वाळवा हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. या तालुक्याने क्रांती केली आहे. शेवटी जमिनीवर पाय ठेऊनच काम करायचं असतं. सर्व सामान्यांच्या मदतीला धावले पाहिजे. इस्लामपूरमध्ये पहिल्या मजल्यावर आमच्या पक्षाचे कार्यालय आहे. केदार पाटील यांच्या प्रयत्नातून सुरुवात याठिकाणी झाली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. शेतकरी हिच आमची जात आहे. शेतकऱ्यांच्या पोटीच आम्ही जन्मलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला कळतात. बाजारपेठेला उर्जितावस्था देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मी राज्याचा अर्थमंत्री आहे, त्यामुळे आपण काळजी करू नका,

    धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड ; मोठा साठा जप्त – महासंवाद
    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed