• Fri. Jun 12th, 2026

    बोरिवली-गोराई प्रवास होणार सोपा, साडेनऊ कोटी खर्चून उभारली जाणार नवी जेट्टी

    बोरिवली-गोराई प्रवास होणार सोपा, साडेनऊ कोटी खर्चून उभारली जाणार नवी जेट्टी

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई: बोरिवली ते गोराईदरम्यान बोटीने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली बाजूने साडेनऊ कोटी रुपये खर्चून नवीन जेट्टी उभी होणार आहे. त्यावर तब्बल १२८० वॉट्सची दिव्यांची रोषणाई असेल.

    बोरिवलीहून पश्चिम किनाऱ्यावरील गोराई, मनोरी येथे जाण्यासाठी खाडीचा सामना करावा लागतो. मुख्य भूमी ते गोराई यादरम्यान मानोरीची खाडी असून त्यावर कुठलाही पूल नाही. या स्थितीत बोरिवली ते गोराई व गोराई ते बोरिवलीदरम्यान चालणारी फेरी सेवा ही दैनंदिन प्रवास करणाऱ्या स्थानिकांसाठी एकमेव माध्यम आहे. अशातच बोरिवली दिशेकडील जेट्टी जुनी झाल्याने स्थानिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या जेट्टीवरील दिवे खराब झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी स्थानिकांना अत्यंत सावध होऊन यावरून पायी जात फेरी गाठावी लागते. प्रामुख्याने ओहोटीवेळी फेरीसाठीच्या बोटी बऱ्याच दूर उभ्या राहतात. त्यामुळे कमकुवत झालेल्या जेट्टीवरून रात्रीच्या अंधारात बोट गाठणे जिकीरीचे ठरत असल्याने या जेट्टीच्या दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक करीत आहेत.

    नव्या जेट्टीसाठी महाराष्ट्र मॅरिटाइम बोर्डाने निविदा काढली आहे. या निविदेनुसार, संबंधित कंत्राटदाराला जवळपास ३० मीटर लांबीची नवीन जेट्टी सध्याच्या जेट्टीच्या उत्तरेकडे बांधायची आहे. जेट्टीच्या दोन्ही बाजूला जवळपास साडे पाच मीटरचा उतार असेल. एकूण ५८०.०४ चौरस मीटरची जेट्टी असेल. ९ कोटी ५९ लाख ६८ हजार ७७८ रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. २८ डिसेंबर ही निविदा भरण्याची अखेरची तारिख आहे. याखेरीज प्रत्येकी २०० वॉट क्षमतेचे चार मोठे प्रकाशदिवे १२.५० मीटरच्या उंचीवर आणि ४५ वॉट क्षमतेचे १० पथदिवे सहा मीटरच्या उंचीवर उभे करायचे आहेत.

    रो-रो सेवाही सुरू करता येणार

    दरम्यान, ही जेट्टी फेरी बोटीखेरीज भविष्यातील रो-रो सेवेसाठीदेखील असेल. यासाठीच तेथे टर्मिनल इमारतही उभी होणार असून त्याचादेखील निविदेत समावेश आहे.

    ना तेजस्वी प्रकाश, ना स्वर्ग, मृत्यूनंतर नेमकं काय होतं? २४ मिनिटं मृतावस्थेत राहिलेल्या महिलेने सगळंच सांगितलं
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed