फडणवीसांना राज्यातील युवा गंभीर आहे असं नाही….. : रोहित पवार
स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांची हे सरकार लूट करत आहे. हजार रुपये देण्याची परिस्तिथी मुलांची नाही. सरकार हे लोकांसाठी असते लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी नाही.आम्ही हा मुद्दा अधिवेशनात मांडल्यावर फडणवीस यांनी आम्हला उत्तर दिले की आताची पिढी सिरीयस नाही. मात्र, आम्ही ही पदयात्रा करुन या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ ही की युवा पिढी सिरीयस असून येत्या अधिवेशनात आम्ही परीक्षा शुल्क व सरकारी भरती बाबत मुद्दे लावून धरणार आहोत, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे वाशिम येथे युवा संघर्ष यात्रा निमित्त आले असताना सांगितले.
डिसेंबरअखेरपर्यंत हे सरकार टिकणार नाही: रोहित पवार
हे सरकार संपूर्ण गोंधळलेले असून मुख्यमंत्री आज वेगळं बोलतात उद्या वेगळं बोलतात,असा आरोप रोहित पवार यांनी केला. मंत्र्यां-मंत्र्यांमध्ये वाद आहेत. मंत्र्यांना काय चाललं त्यांनाच कळत नाही, एक मंत्री कॅबिनेटमध्ये न बोलता रस्त्यावर येऊन आक्रमक पणे बोलतात.हे गोंधळलेले निकामी सरकार आहे असे आम्हाला वाटते, अशी टीका रोहित पवार यांनी वाशिममध्ये केली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News