• Sat. Sep 21st, 2024

विमा कंपन्यांकडून सरकारला वाटा मिळतोय काय? अंबादास दानवे यांचा जळजळीत सवाल

विमा कंपन्यांकडून सरकारला वाटा मिळतोय काय? अंबादास दानवे यांचा जळजळीत सवाल

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिठीत १६ जिल्ह्यातील शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे करत सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी केली. विमा कंपन्यांची दादागिरी, मक्तेदारी वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊनही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. वेबसाइट हँगमुळे अर्ज भरता येत नाहीत. कंपन्या सरकार आणि प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नाहीत. सरकार विमा कंपन्यांचे बटीक बनले असून एक रुपयात विमा देत असल्याचे सांगणाऱ्या सरकारला यात वाटा मिळाला की काय? आरोप दानवे यांनी केला.

अवकाळी पाऊस, गारपिठीने झालेल्या शेतीपिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विविध जिल्ह्यात पाहणी केली. यानंतर विरोधी पक्षनेते दानवे यांनी विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

पाहणीचा फार्स करा, पण मदतही वेळेत द्या! अनुभवांनी पोळलेल्या शेतकऱ्यांसह संघटनांची अपेक्षा
दानवे म्हणाले, अवकाळी पावसाने राज्यातील १६ जिल्ह्यात शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. त्यात मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विभागात ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकार बाहेरच्या राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात जुंपलेले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.

आजचा अग्रलेख: अस्मानी सूड
राज्यसरकार केंद्राची मदत घेऊ असे सांगते आहे, याचा अर्थ राज्य सक्षम नाही. सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु त्याचा निधी दिला नाही. त्यापूर्वी अवकाळी, सततचा पाऊस, मागच्या अतिवृष्टीचे पैसेही सरकारने दिलेले नाहीत. केवळ नुकसान भरपाईच्या घोषणा सरकार करते आहे. येत्या अधिवेशनात यावर आवाज उठविण्यात येईल. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. पण या विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला फाट्यावर मारत न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, लक्ष्मण वडले, वसीम देशमुख, नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी केली होती. परंतू शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली नाही. अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. राज्य सरकारने ४० तालुके दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सुध्दा केंद्राकडे मदत मागावी लागणार असल्याचे सरकार सांगत आहे. दुष्काळ संपुर्ण मराठवाड्यात जाहीर व्हावा, अशी आमची मागणी आहे. आणि आताच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed