• Sun. Mar 8th, 2026

    साताऱ्यात थंडी गायब, अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, रब्बी पिकांना फायदा, फळबाग शेतकरी चिंतेत

    साताऱ्यात थंडी गायब, अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, रब्बी पिकांना फायदा, फळबाग शेतकरी चिंतेत

    सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळ्यातील पश्चिम भाग या अवकाळी पावसाने झोडपून काढला. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भात शेतीसह स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    सातारा शहरात तर रात्री साडेसातच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली ती उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे रस्त्यावर सामसूम निर्माण झाली होती. या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असला तरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे. भात काढणीस आलेले भातही या पावसामुळे भुईसपाट झाले आहे. पावसामुळे काढणीला आलेले भात, तसेच कापून ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

    नोव्हेंबर महिना संपत आलातरी थंडीला जोर नाही. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागानेही अवकाळी पावसाचा अंदाज गेल्या आठवड्यात वर्तविलेला. हा अंदाज सातारा जिल्ह्यात खरा होताना दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली, तर सातारा शहर आणि परिसरात जवळपास तीन तास मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले.
    ब्रम्हदेव जरी आला तरी…, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य, शहाजीबापूंचं टेन्शन वाढलं
    सातारा जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. तर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बीतील ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाला होणार आहे. पण, फळबागांना फटका बसू शकतो. कारण, अनेक भागात द्राक्ष, डाळिंब फळबागा पक्व अवस्थेत आहेत. अशात गारपीट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या पावसामुळे गेले दोन तास सातारा शहरातील लाईट बंद असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
    भाजप आरएसएसची संविधान बदलाची भाषा,आम्ही संविधानाच्या बाजूनं राहणार ही आमची भूमिका : प्रकाश आंबेडकर
    दरम्यान, विजांच्या कडकडाटासह वादळ व ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
    डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed