• Wed. Mar 11th, 2026

    राज्यमार्गाचे काम रखडले; नागरिकांमध्ये संताप, बीआरएसच्या अनोख्या आंदोलनाने वेधलं लक्ष

    राज्यमार्गाचे काम रखडले; नागरिकांमध्ये संताप, बीआरएसच्या अनोख्या आंदोलनाने वेधलं लक्ष

    चंद्रपूर: जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या आंदोलनातून आपली भूमिका ठेवत असतात. अशाच एका आंदोलनातून बीआरएसने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. हा प्रश्न घेत बिआरएसने गांधीगीरी करत सरकारला चिमटे काढले.
    तब्बल २४८ गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित; डेव्हलपर्सवर महारेराकडून कारवाईचा बडगा, कारण काय?
    जिल्ह्यात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात बीआरएसने आज (सोमवार) राज्यमार्गाचा प्रश्न घेत अनोखे आंदोलन केले. या राज्यमार्गाचे भूमिपूजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज भूमिपूजनाला पाच वर्ष झाले, मात्र मार्गाचे काम अपूर्ण आहे. या मार्गाने तेलंगणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील वीस गावातील नागरिक ये जा करतात. मार्गांवर अनेक ठिकाणी गिट्टी पसरविली आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेला आहे. यामुळे मार्गांवर अनेक अपघात झाले आहे. अनेकांचा जीव गेला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाचा प्रश्न महत्त्वाचा असतानाही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही. हा प्रश्न घेत आज बीआरएसने आंदोलन केले.

    मराठवाडा पाणी प्रश्न चिघळला; पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष, राजेश टोपेंसह पन्नास आंदोलक ताब्यात!

    धाबा बसस्थानक चौकात भारत राष्ट्र समितीचे नेते भूषणजी फुसे यांचा नेतृत्वात गांधीगिरी आंदोलन झाले. पाच वर्षाचा कालावधी घेऊन अतिशय उत्कृष्ट मार्ग केला, असा उपहासात्मक टोला करत फुसे यांनी सरकार, आमदार आणि प्रशासनाचे जिलेबी वाटून चिमटे काढले आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने गोंडपिपरी तालुक्यातील जनता उपस्थित होती. आंदोलनाचे नेतृत्व भूषण भुसे यांनी केले. आंदोलनात राकेश चिलकुरवार, सन्नी रेड्डी, सुरज उपरे, इस्लाम शेख, उमाकांत वाघमारे, सुभाष हजारे, महेंद्र ठाकूर यांनी लोकप्रतिनिधीवर ताशेरे ओढले. गोंडपिपरी तालुक्यातील बीआरएसचे देवानंद डोंगरे, अरुण बोरकर, रमेश बोरकर आंदोलनात उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed