• Mon. Jun 15th, 2026

    ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला गालबोट, निकालानंतर सायंबाचीवाडीत धुमश्चक्री,दोन गटांकडून दगडफेक

    ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला गालबोट, निकालानंतर सायंबाचीवाडीत धुमश्चक्री,दोन गटांकडून दगडफेक

    पुणे : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यापैकी काही गावातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पुण्यातील बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून आली. बारामतीमधील सायंबाचीवाडी गावात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    बारामतीमधील सायंबाचीवाडीमधील विकास सोसायटीच्या निवडणूकीचा वाद शमतो न शमतो तोपर्यंतच ग्रामपंचायत निवडणूक लागली. सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ६) ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर धुमश्चक्री झाली. दोन गट एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरु आहे.
    यशतंवराव म्हणाले होते, ‘राज्य मराठीजनांचं, मराठ्यांचं नाही’; माझा सरसकट आरक्षणाला विरोधच : भुजबळ

    सायंबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्योजक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू परिवर्तन पॅनेल आणि डी. पी. जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. या पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले आहेत. दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेलने दोन सदस्यांसह सरपंचपदाची जागा जिंकली.

    अधिक जागा जिंकलेला श्री स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनलचे कार्यकर्ते विजयानंतर देवदर्शनाला निघाले होते. येथील गावची यात्रा आहे, याचवेळी श्री स्वयंभू परिवर्तन पॅनल यांचे कार्यकर्ते देवदर्शनाला आले. समोरासमोर ते आल्यानंतर सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर दगडफेक झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ तेथे पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
    जोडीने फॉर्म भरला, जोडीनेच प्रचार, मतदारांचा फुल्ल सपोर्ट, पुण्याच्या कुरकुंभमध्ये नवरा बायकोने गुलाल उधळला
    दरम्यान, पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वाचं लक्ष लागलेल्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवारांच्या समर्थकांच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. तर, भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार समर्थकांचा वरचष्मा राहिला आहे.
    टीम इंडियाला रोखने अशक्य! या पाच गोष्टींमुळे रोहित वर्ल्डकप जिंकणार, ही एक गोष्टच ठरू शकते अडथळा
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed