• Wed. Mar 11th, 2026
    भुजबळांवर प्रश्नांची सरबत्ती, मास्टरमाईंड कोण विचारत मनोज जरांगे पाटील भडकले

    छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे आरक्षण संपणार नाही. आरक्षण देण्याची इच्छा नसल्यामुळे छगन भुजबळ यांची केविलवाणी राजकीय धडपड सुरू आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात जिवाभावाचे संबंध आहेत. भुजबळ म्हणाले तरी ओबीसी मराठा आरक्षणाला विरोध करणार नाहीत. भुजबळांनी केलेल्या आरोपामागे केवळ राजकारण आहे, असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्या टीकेला दिले. तसेच भुजबळ यांच्यामागे कोण मास्टरमाईंड आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
    कुणबी नोंदीची व्यापक छाननी होणार, मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय ठरलं?
    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके आणि बीड येथे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांची भेट घेतली. मराठा आरक्षण आंदोलनात सोळंके यांच्या घराला आणि राऊत यांच्या हॉटेलला आग लावण्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शहरात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आणि आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. या आरोपांना मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे हा वाद धुमसण्याची शक्यता आहे. कुणबी नोंदीची संख्या अचानक वाढत असल्याबाबत भुजबळ यांनी प्रश्न केला होता. या नोंदी वाढण्यामागे कोणताही घोळ नाही. राज्य सरकारची यंत्रणाच त्या नोंदी शोधत आहेत आणि भुजबळ साहेब सत्तेत आहेत, असे जरांगे म्हणाले.

    ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी करेंगे या मरेंगे असे भुजबळ बोलले. त्यांच्या पोटात होते ते ओठात आले. या प्रकारचे वक्तव्य म्हणजे हिंसेला उत्तेजन आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. ‘धनगर आणि ओबीसींवर भुजबळ बोलत आहेत. पण, उपोषण करणारे धनगर बांधव मरायची वेळ आली असताना भुजबळ चौंडी येथे किती वेळेस भेटायला गेले. राजकीय फायद्यासाठी त्यांना धनगर, ओबीसी, बांधवांची आठवण येते. बीड येथील जाळपोळीचे कधीही समर्थन केले नाही. पोलिस हातावर हात देऊन उभे राहिल्याचे भुजबळ म्हणाले.त्यांनी विनाकारण पोलिसांवर टीका करू नये’, असे जरांगे म्हणाले.

    फडणवीसांचा एकेरी उल्लेख, भुजबळांनी जरांगेंना फैलावर घेतलं, खडे बोल सुनावलं

    अंतरवाली येथे लाठीमाराची घटना झाल्यानंतर पोलिसांवर हल्ले झाले. या प्रकरणाची चौकशी होण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई झाली, अशी टीका भुजबळ यांनी केली. त्यावर बीडमधील हिंसाचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. त्याप्रमाणे अंतरवाली घटनेची गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, असे प्रत्युत्तर जरांगे यांनी दिले.

    भुजबळ यांची बीड भेट ही राजकीय सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे. कुणबी नोंदी तपासणे आणि आरक्षण देणे म्हणजे मराठ्यांची दहशत नसून सरकार आणि कायद्याला सत्यता पटली आहे. मागील सरकारची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करीत आहे. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल असले तरी आम्ही न घाबरता लढाई शांततेत जिंकू. भुजबळांचे वक्तव्य वातावरण दूषित करणारे आहे. पण, आम्ही एकोपा टिकवू’, असे जरांगे म्हणाले.

    जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
    मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत पुणे विभागीय निपुणता केंद्रातील प्रशिक्षणासाठी पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
    येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवावे – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed