• Sat. Mar 7th, 2026
    कल्याणमध्ये भाजप आमदाराच्या लेकाची राजकारणात एन्ट्री, वैभव गायकवाडांच्या उमेदवारीची चर्चा

    कल्याण : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गणपत गायकवाड याची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कल्याण पूर्वेला जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. वैभव यांचे कल्याण पूर्वेत वाजत गाजत आणि शक्ती प्रदर्शन करत स्वागतही करण्यात आले. त्यामुळे कल्याण लोकसभेतील राजकीय पटलावर अजून एक युवा नेतृत्व तयार होणार आहे.

    कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे गटातील युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे, शिंदे गटातील कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, मनसे आमदार यांचे बंधू कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील आणि यानंतर वैभव गणपत गायकवाड. वैभव यांची प्रत्यक्ष राजकारणात एन्ट्री झाल्याने राजकीय समीकरणं बदल्यण्याची शक्यता आहे.

    ठाकरे गट कार्यकारिणीचा विस्तार, मात्र मुंबईकर नेत्यांवरच मदार, ग्रामीण भागात नाराजीचा सूर
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मैदानात उतरली असली तरी स्थानिक पातळीच्या राजकारणामध्ये भाजप पदाधिकारी आणि सेनेच्या पदाधिकारी यांचे पटत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड समाजमाध्यमांवर भिडले आणि हा वाद तर इतका विकोपाला गेला की दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

    बोरवणकरांचा हवाला, नितेश राणेंचे नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप; सेना आमदारांची शिंदेंकडे तक्रार
    त्यानंतर विकासकामांवरून राजकारण झाले. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या वाढदिवसाला भावी आमदार असे बॅनर झळकवले. त्यातच आता वैभव यांची प्रत्यक्ष राजकारणात एन्ट्री झाल्याने कल्याण पूर्वेतून आमदारकीसाठी भाजपचे उमेदवार म्हूणन वैभव यांच्याकडे पाहिले जात आहे.

    वादळं येत राहणार, वैयक्तिक नाती जपुया; रोहित पवारांच्या मातोश्रींची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट
    दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड हे तीनदा निवडून आले, तेव्हा वैभव प्रत्यक्ष राजकारणात नव्हते. बॅकएन्डला वडिलांचे काम पाहत होते. तर आता त्यांची राजकारणात एन्ट्री झाल्याने आमदार गायकवाड हे बॅकएन्डला राहून वैभव यांना आमदारकीसाठी तयार करु शकतात असे जाणकारांचे मत आहे.

    शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रम रोखला, पोलिसांकडून कार्यक्रमाला परवानगी रद्द!

    याबाबत वैभव गायकवाड यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की मी चांगल्या राजकारणाची सुरुवात व्हावी म्हणून आलो आहे, चेंज द सिस्टीम, आय एम सिस्टम त्याच गोष्टीसाठी मी आलो आहे, असे वैभव यांनी सांगितले. माझ्या बॅनरवर काही लोकांनी बॅनर लावले झाकण्यासाठी, मी समजून गेलो माझी सुरवात झाली, मी वाद नाही करणार. तुम्ही लोकांच्या मनातून मला काढू शकत नाही, असा टोलाही विरोधकांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी हाणला आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed