• Thu. Jun 11th, 2026
    पावसाची पाठ,सांगलीत कृष्णामाई कोरडी, दीड दिवसांच्या गणपतींचे काल पाण्यात विसर्जन आज दर्शन

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीत कृष्णानदीची पाणी पातळी अतिशय घटली आहे. नदी पूर्णपणे कोरडी पडली असल्यानं गणपती विसर्जन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाण्याची व्यवस्था करणे आवशयक आहे. कोयनेतून पाणी सोडले तरच यंदा सांगलीत कृष्णा नदीपात्रात गणपती विसर्जन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हे पाणी लवकर सोडण्याची मागणी होत आहे. सध्या कृष्णा नदीमध्ये फक्त एक फूट पाणी आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काल दीड दिवसाचा गणपतींचे विसर्जन झाले होतो ते गणपती देखील आता दिसू लागले आहेत.

    कृष्णा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने घट झाल्याने सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. सांगलीत पाणी तातडीने येणे आवश्यक आहे. अन्यथा पाचवा व सातव्या दिवशी मोठ्या गणेशमूर्तींचे विर्सजन करणे अडचणीचे असणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. उलट पाणी झपाट्याने खाली येऊ लागले आहे.

    सांगलीत तर कृष्णा नदीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी पाणी सध्या उपलब्ध होत आहे. पण, आता गणेशोत्सवाच्या काळात पाण्याची चिंता जाणवत आहे. काल दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मात्र कृष्णा नदीत पाणी कमी असल्याने विसर्जित केलेल्या गणपतींच्या मूर्ती पाण्याबाहेर आल्या आहेत. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडणे गरजेचे आहे.

    टाटा मेमोरिअल सेंटरचं पुढचं पाऊल,कॅन्सरवरील उपचारांसाठी औषधी वनस्पतींवर संशोधन करणार, पेणला ५० एकरांवर प्रकल्प
    यंदा राज्यात सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. गणपतीच्या काळात दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णेत आता गणपीबाप्पाची मूर्ती बुडेल इतकं ही पाणी ही स्थिती आहे. यावर शक्य तितक्या लवकर कोयनेतून पाणी सोडण्याची गरज आहे. सांगलीत नदीकिनारी ही अवस्था आहे तर दूर येथून १८० किलोीटरवरील जत तालुक्यातील परिस्थिती तर अजूनच गंभीर आहे. तिथे तर लोकांनी तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले नाही तर गणपतीची मूर्तीचे विसर्जनच करणार नसल्याचा इशारा सरकारला दिला आहे.
    १६ आमदारांच्या अपात्रतेबाबातच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, हालचालींना वेग, सोक्षमोक्ष लागणार
    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून गेला आहे. गेली कित्येक वर्षे सरकारकडे पाणी मागून थकलेले शेतकरी पायी मुंबईला जाऊन मुख्यमत्र्यांचीभेट घेऊनही आले. पण, तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली. आश्वासना शिवाय त्यांच्या पदरात काहीही पडले नाही . म्हणून आता या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आता सरकार विरोधात वेगळे पाऊल उचलले आहे. त्यांनी आता निर्धार केला आहे की जोपर्यंत सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी त्यांच्या भागात असलेल्या वेगवगळ्या तलावात सोडत नाही तोपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही. त्या कोरड्या पडलेल्या तलावातच सर्व मूर्ती मध्यभागी ठेवून आंदोलन करणार असा इशारा येथील चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी भारताला मिळाली गुड न्यूज, सामना जिकणं होणार सोपं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed