• Sat. Sep 21st, 2024

मार्क्सवाद्यांच्या विचारधारेचे स्मशान तयार, त्यांची उत्तरक्रिया आपल्यालाच करायची आहे: भागवत

मार्क्सवाद्यांच्या विचारधारेचे स्मशान तयार, त्यांची उत्तरक्रिया आपल्यालाच करायची आहे: भागवत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘दैवी आणि असुरी प्रवृत्तीतील लढाई जुनीच आहे. त्यातील पात्र, रूपे, शस्त्रे बदलली; प्रवृत्ती मात्र एकच आहे. सत्य दडपून असत्यच सत्य असल्याचा भ्रम निर्माण करणे हे अस्त्र असुरी प्रवृत्तींनी आता देशाकडून कुटुंबांपर्यंत आणले आहे. त्याला राजकीयदृष्ट्या योग्य पद्धतीने उत्तर देत त्यांची यथासांग उत्तरक्रिया परंपरेने भारतालाच करायची आहे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केले.

दिलीपराज प्रकाशनातर्फे अभिजित जोग लिखित ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. या वेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. शांतीश्री पंडित, लेखक जोग, प्रकाशनाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव बर्वे उपस्थित होते. मधुमिता बर्वे यांनी आभार मानले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

देशातील सामाजिक भेदभाव संपत नाही तोपर्यंत संघाचा आरक्षणाला पाठिंबा: मोहन भागवत

‘देव तर अमर आहेत; पण सनातन नष्ट झाले, तर नुकसान कोणाचे होईल,’ असा सवाल करीत डॉ. भागवत म्हणाले, ‘सांस्कृतिक मार्क्सवाद या तथाकथित शब्दात संस्कृतीही नाही आणि मार्क्सही नाही. मार्क्सला त्यांनी केव्हाच रद्द केले आहे. जागलेले नव्हे, तर जग जिंकण्यासाठी वखवखलेले हे अहंकारी लोक त्यांच्या अंतकाळी भारतात पोहोचले. मात्र, त्यांच्या विचारधारांचे छानसे स्मशान आपल्याकडे तयार आहे. त्यांची उत्तरक्रिया परंपरेने आपल्यालाच करायची आहे,’ असे सांगून ‘आपला समाज एका पोथीत बांधलेला नाही, हीच त्याची ताकद आहे. भारताच्या इतिहासात कोणत्याही काळात आपल्या समाजाने सर्व गोष्टी एक प्रमाण मानून त्याप्रमाणे व्यवहार केलेला नाही. सत्यमेव जयते मानणाऱ्या भारतात असत्याचा विजय होणार नाही,’ असेही डॉ. भागवत म्हणाले. ‘जी-२०’च्या इतिहासात कधीही घडले नाही ते भारतातील बैठकीच्या पहिल्याच दिवशी घडले. जाहीरनामा मान्य होऊन लागूही झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडला आहे. मी हिंदू आहे आणि संघाची बालसेविका होते, याचा मला अभिमान असल्याचे पंडित म्हणाल्या. समता, विवेकवाद आणि शोषणमुक्ततेचा आभास दर्शविणाऱ्या डाव्या विचारसरणीमागे टोकाचा द्वेष, हिंसा, ईर्शा कशी दडली आहे, हे या पुस्तकातून मांडल्याचे जोग म्हणाले.

पुण्यात संघाच्या समन्वय बैठकीचं काटेकोर नियोजन, बारकोडचे आयडी, मोबाइल नेण्यासही बंदी

‘जबाबदारी सर्वांचीच’

‘या संकटाचा प्रतिकार करणे ही कोण्या एका संघटनेची जबाबदारी नाही. हे आपल्या घरावर, देशावर, जगावर आणि माणुसकीवर आलेले संकट आहे. त्याच्या तावडीत सापडलो, तर आपल्यालाही पशू बनवतील. ते होऊ न देता त्यांनाही पशुत्वातून मुक्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण ही चतुःसुत्री महत्त्वाची आहे,’ असेही डॉ. मोहन भागवत म्हणाले.

‘जेएनयू’पेक्षा अधिक डावे ‘पुणे विद्यापीठा’त

‘डाव्यांनी १९६९मध्ये कॅबिनेट मंत्रीपद नाकारत जेएनयू ताब्यात घेतले. तिथूनच त्यांनी आपले विखारी विचार पसरवले. ‘जेएनयू’पेक्षा अधिक डावे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहेत. त्यांचा त्रास मी ३२ वर्षे सहन केला. मात्र, त्याबळावरच मी ‘जेएनयू’मध्ये टिकू शकले,’ असे डॉ. शांतीश्री पंडित म्हणाल्या.

समता, विवेकवाद आणि शोषणमुक्ततेचा आभास दर्शविणाऱ्या डाव्या विचारसरणीमागे टोकाचा द्वेष, हिंसा, ईर्शा कशी दडली आहे, हे या पुस्तकातून मांडले आहे. देव, देश आणि धर्माचा विध्वंस करणाऱ्या सांस्कृतिक मार्क्सवादाचे पुढचे लक्ष्य भारत आहे.

– अभिजित जोग, लेखक

भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट, अजित पवारांचा झुकून सरसंघचालकांना नमस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed