• Thu. Mar 19th, 2026
    संजय राऊतांबाबतच्या चर्चेवरून मविआत वादाची ठिणगी? मुंबईतील जागेमुळे नवा पेच

    मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी, अशा प्रकारची चर्चा ठाकरे गटामध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नसून पक्षाकडून आदेश मिळाल्यास निवडणूक लढवण्याबाबत विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत घोषणा होण्याआधीच या लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    संजय राऊत राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी का? या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसला तरी अशा प्रकारची कुजबूज पक्षांतर्गत सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील काही नेत्यांकडून अशा प्रकारची इच्छा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सदर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना टक्कर देण्यासाठी संजय राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Gondia Ballarpur Passenger: पॅसेंजर तीन तास थांबली, प्रवाशांचा संताप; मोटारमनचं उत्तर ऐकून तळपायाची आग मस्तकात

    ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या मनोज कोटक हे खासदार आहेत. याआधी भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे खासदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेने २०१९ साली येथून किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर ही जागा मनोज कोटक यांना भाजपकडून देण्यात आली होती. तेव्हाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असल्याने मनोज कोटक यांच्या विजयाचा मार्ग सोपा होता.

    ईशान्य मुंबईत भाजपच, मनोज कोटक यांना विश्वास

    भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती. परंतु संजय पाटील हे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर संजय पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर सद्यस्थितीत या लोकसभा मतदारसंघात तीन आमदार भाजपचे दोन शिवसेना ठाकरे गटाचे आणि एक समाजवादी पक्षाचा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडी म्हणून विचार करताना शिवसेना ठाकरे गट त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष या जागेसाठी दावा सांगण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed