• Sat. Sep 21st, 2024
बैलगाडा शर्यतींना पुन्हा ब्रेक, राज्यातील या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण समोर

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र, सांगली जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. हे कारण म्हणजे सागंली जिल्ह्यात लम्पीचा पुन्हा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यातील १ हजार ९२ जनावरे बाधित झाल्यानं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

मागील वर्षभर लम्पी रोगावर नियंत्रण मिळविल्यानंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा लम्पी रोगाने डोके वर काढले आहे. दोन महिने अपवादात्मक आढळणार्‍या लम्पीने थैमान घातले असून सध्या १ हजार ९२ जनावरे बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ७२ जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सव्वातीन लाख गायवर्ग जनावरांपैकी १ लाख ७५ हजार जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

गेल्या चार महिन्यांत १ हजार ६२९ जनावरे बाधित आढळून आली आहेत, परंतु गत आठवड्यापासून लम्पीचा उद्रेक झाला आहे. सध्या १ हजार ९२ जनावरे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४८८ जनावरांचा समावेश आहे. बाधित जनावरांपैकी ७२ जनावरे दगावली आहेत. गाय २७, बैल १० आणि २५ वासरांचा मृत्यू झाला. जिल्ह्याच्या ज्या भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे. त्या ठिकाणी लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. बाधित जनावरांचे आयसोलेशन, औषधोपचार, लसीकरण याबाबत आवश्यक खबरदारी घेऊन पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान ३ चंद्रावर कधी उतरणार, इस्त्रोनं तारीख अन् वेळ सांगितली, जाणून घ्या अपडेट
लसीकरण व फवारणीसाठी पथके कार्यरत ठेवावीत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करणे, शर्यती बंद करण्यात येणार आहेत, याशिवाय जनावरांची वाहतूक बंद करण्याच्या उपाय योजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिल्या आहेत.
पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करणार, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
सांगली जिल्ह्यात लम्पी रोगाचा पुन्हा प्रसार झाला असताना पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ३ लाख २४ हजार ७५६ गाय वर्गीय जनावरांपैकी १ लाख ७५ हजार ५११ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. उर्वरित लसीकरण गतीने राबविण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांना वगळलं; ‘या’ कारणामुळे पक्षाकडून पत्ता कट?

इंदापुरात बैलगाडा घुसला थेट नदीच्या पात्रात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed