• Sat. Sep 21st, 2024

कोकणातील ‘या’ गावात भूगर्भातून येतायत विचित्र आवाज, यंत्रणा धास्तावल्या, संकटाची चाहूल?

कोकणातील ‘या’ गावात भूगर्भातून येतायत विचित्र आवाज, यंत्रणा धास्तावल्या, संकटाची चाहूल?

महाड: रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात कसबे शिवथर गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे आवाज असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. या सगळ्या घटनेनंतर महाडचे प्रांत अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व प्रशासनाने गावात येऊन ग्रामस्थ संवाद साधून ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या भागाची पाहणी करण्याकरता सोमवारी भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आला आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन टीम, एमआयडीसी पोलिस अधिकारी, महाड तहसीलदार साहेब, महाड प्रांत तसेच N.D.R.F टीम यांनी कसबे शिवथर गावाला भेट देवून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच भूगर्भशास्त्रज्ञ गावाला भेट देऊन पुढील तपास करणार आहे. हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाड तहसीलदार प्रांत या सगळ्यावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान शनिवारी याच परिसरात मोठे आवाज येत असल्याची माहिती या गावातील स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देण्यात आले आहेत सोमवारी या ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञ भेट देणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘कोयना’ परिसर संवेदनशील, ९ तालुक्यात भूस्खलनाचा धोका, कोल्हापूरकरांच्या झोपा उडाल्या

दरवर्षीच्या पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील काही भाग हा दरड कोसळणे भूगर्भात घडणाऱ्या घटना यासाठी काहीसा संवेदनशील बनला आहे. शिवथरघळ गावात सुरुंग फोटासारखे मोठे आवाज भूगर्भात येत असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी आपली राहते घरी सोडून सुरक्षित ठिकाणी मंदिर परिसरात आसरा घेतला होता. हे आवाज नेमके कोणत्या कारणामुळे येत आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या सगळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे. शनिवारीही अशा स्वरूपाचे आवाज झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

इर्शाळवाडीवर त्या रात्रीत काळ कोसळला! दरडीच्या भीषण घटनेमागचं नेमकं कारण आलं समोर

१५ दिवसांपूर्वी रायगड जिल्हयात इर्शाळवाडी दुर्घटनेत अख्खी वाडी डोंगराखाली गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास ८० माणसे मृत्यूमुखी पडली होती. या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा दरडप्रवण क्षेत्रात सर्व्हे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमी वर शिवथर येथे येत असलेले भूगर्भातून मोठे आवाज हे ग्रामस्थां च्या जिवाचा थरकाप उडवत आहेत. प्रशासनाने या सगळ्याची गंभीर दखल घेतली असून आज येणार्‍या भूगर्भ शास्त्रज्ञांकडून नेमका कोणता अहवाल दिला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर, नातेवाईकांचा मन हेलावणारा हंबरडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed