• Thu. Mar 12th, 2026
    कोकणात नागरिकांनी काळजी घ्या, आरोग्य विभागाच्या सूचना; चिंता वाढवणारी बातमी समोर

    सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील शिरवल गाव साथग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून त्या गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश्य रूग्ण सापडले आहेत. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका मृत्यूचे कारण स्पष्ट होणे बाकी आहे. यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

    वैभववाडी तालुका वगळता अन्य ७ तालुक्यात डेंग्यूचे एकूण ४३ रुग्ण आढळून आले आहेत. कसाल, पडवे, बांदा इथे साथीचा उद्रेक झाला आहे. त्यात एकाचा गोवा बांबुळी इथे मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत कणकवली शिरवळ इथे तापाचे अहवाल आढळलेले आहेत. चार रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. ९ ऑगस्टपर्यंत साथीचा उद्रेक होईल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, त्याचप्रमाणे पुन्हा नव्याने रुग्ण आढळल्यास रुग्ण आढल्याच्या दिनांकापासून पुढे १४ दिवस उद्रेक कायम राहील असेही स्पष्ट करण्यात आले.

    Maharashtra Rain : राज्यात पाऊस रेंगाळला, फक्त एका जिल्ह्यात ऑरेंज तर पुण्यासह या भागांना यलो अलर्ट जारी
    साचलेल्या पाण्यात डेंग्यू आजाराच्या अळ्या निर्माण होतात. यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी तर एकाचा तापाने मृत्यू झाला आहे. अशात कोणताही ताप अंगावर काढू नये, पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

    समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना, मध्यरात्री गर्डरसह क्रेन कोसळली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed