महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा वेगळेच डोहाळे :
२०१९ मध्ये राज्यात भाजप विरोधात एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडी तयार होत असताना या निर्मितीमध्ये छोट्या पक्षांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, सरकार स्थापन झाल्या नंतर सरकार मधले जे प्रस्थापित पक्ष होते त्यानी छोटा पक्षांकडे कानाडोळा केला. यामुळे आम्हाला महाविकास आघाडीचा अनुभव अतिशय वाईट आला. सत्ता प्राप्त होतात महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा वेगळेच डोहाळे लागले. केवळ सत्तेवरचे चेहरे बदलण्यासाठी सत्ता आम्हाला नको होत तर सत्ते बरोबरच व्यवस्था परिवर्तन करू शकेल असं सरकार आम्हाला हवा आहे. शिवाय भाजप व एनडीए कडून सुरू असलेल राजकारण हे अत्यंत वाईट असून भाजप फोडा आणि जोडा पद्धतीचे आणि धार्मिक तेढ निर्माण करत जे राजकारण सुरू केलं आहे याला आमचा विरोध आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
प्रस्थापित पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याने अनेक छोटे पक्ष आले एकत्र :
राज्यातील असलेले मोठे प्रस्थापित पक्ष हे आपल्या मूळ विचारधारेपासून लांब जात असून या पक्षातील नेत्यांमध्ये स्वार्थ मोठ्या प्रमाणात बरबटलेला आहे यामुळे पक्ष फुटत आहेत. शिवाय हे पक्ष लोकांपासून देखील लांब जात आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसाला जवळचा वाटावा अशी विचारधारा धरून आम्ही सर्व छोटे पक्ष प्रागतिक विकास मंचच्या व्यासपीठाखाली एकत्र आलो आहोत. आमची शक्ती लहान असली तरी आम्ही एकत्र आहोत असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
या मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, बहुजन विकास पार्टी, शेकाप यासह काही सामाजिक संघटना एकत्र येत असून पुरोगामी विचाराचे आणि प्रगतीक विचाराचे आम्ही सगळे हे छोटे पक्ष आहोत तसेच यामध्ये अजूनही हळूहळू भर पडत चाललेली आहे. शिवाय लवकरच कोल्हापूरमध्ये सुद्धा एक बैठक घेण्यात येणार आहे असे ही राजू शेट्टी म्हणाले आहेत.