• Sat. Sep 21st, 2024

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत गेला, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचा हल्लाबोल

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत गेला, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस ही भाजपची बी टीम आहे असं हिणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षच भाजपसोबत गेलाय, असा हल्लाबोल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. तसेच महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेस ही फुटण्याच्या मार्गावर आहे. आम्ही एनडीएच्या बाजूने नाही, ना इंडियाच्या बाजूने, असे केसीआर म्हणाले. आम्ही महाराष्ट्र राज्यात १४ लाखाहून अधिक पदाधिकारी जोडले आहेत, असेही ते म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
KCR यांची अब की बार किसान सरकार म्हणत साद, बड्या शेतकरी नेत्याचा प्रतिसाद, मोठा निर्णय घेणार, BRS चं बळ वाढणार
‘आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर’

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना यांच्यावर जोरदार टीका केली.
शाळकरी पोरींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंची पब्लिक धुलाई, भररस्त्यात चोपून चपलेचा प्रसाद
महाराष्ट्रात शरद पवार यांनी काँग्रेस फोडली आणि आता शरद पवार यांची राष्ट्रवादीही फुटली. शिवसेना फुटली, आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. अजून किती पक्षांचे तुकडे होतील याचा उत्तर जनता देईल. राज्यात जे काही फुटीचे राजकारण झालं यानंतर अनेकांनी मतदान कार्डही जाळलं, असे म्हणत महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

‘शेतकरी आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन’

आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात केली असली तरी शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन असून आम्ही कोणतीही तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत नाहीये. आता महाराष्ट्राला आपलं नेतृत्व बदलण्याचं संधी समोर आली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी राबवलेला तेलंगण पॅटर्न महाराष्ट्रात राबवा, अशी सूचना भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र सरकारला केल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही दया नाही. महाराष्ट्रातीलच एका अधिकाऱ्याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचा अहवाल दिला. याकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केली.

‘…आम्ही दोघांसोबत ही नाही’

देशभरात एनडीए आणि इंडिया असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. आम्ही यांच्यासोबत नाही. तिसरी आघाडी करण्याचा विचारही नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. देशावर काँग्रेसने पन्नास वर्षे राज्य केले आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते दहा वर्ष सत्ता भोगत आहेत. मात्र लोकांच्या पदरी निराशा शिवाय काय आलेलं नाही. आमच्या कामाची पद्धत बघून अनेक पक्षांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. १४ लाखाहून अधिक पदाधिकारी भारत राष्ट्र समितीचे झालेले आहेत. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचे केसीआर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed