• Fri. Mar 13th, 2026

    मोदींच्या दौऱ्यानंतर अजित पवार ‘इन अॅक्शन’; पुण्यात दर आठवड्याला बैठक, प्रश्न निकाली काढणार!

    मोदींच्या दौऱ्यानंतर अजित पवार ‘इन अॅक्शन’; पुण्यात दर आठवड्याला बैठक, प्रश्न निकाली काढणार!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंगरोड, पुणे -नाशिक रेल्वे, पुणे- बंगळुरू यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला आपण पुण्यात बैठक घेणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    पुणे शहराला वाहतूक कोंडीतूनमुक्त करण्यासाठी रिंगरोड, पुण्याचे पुंरदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे नाशिक रेल्वे, ग्रीन कॉरिडॉर, पुणे-बंगळुरू यासारखे सुमारे ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या प्रस्तावित आहेत. हे प्रकल्प गेल्या वर्षापासून रखडले आहेत. या प्रश्नाबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुपरफास्ट व्यासपीठाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

    तुला सकाळपासून कुणी भेटलं नाही का?, पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार संतापले

    महसूल दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ‘पुरंदर विमानतळाबाबत दोन वाद आहेत. काही जणांना अलिकडे विमानतळ व्हावे असे वाटते. तर काही जणांना पलिकडे व्हावे असे वाटते. पण कोणाला काय वाटते यापेक्षा नागरी विमान वाहतूक विभागाने परवानग्या दिल्या आहेत. पुणे शहराला भविष्याचा विचार करता आंतरराष्ट्रीय विमानतळ असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. गेले एक वर्ष मी विरोधी पक्षात होतो. आज दुपारी मला या गोष्टींवर बोलायचे होते. पंरतु, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात वेळ कमी होता. या निमित्ताने पुणे शहराच्या दृष्टीने जे महत्वाचे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,’ असे आश्वासन द्यायला ते विसरले नाहीत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed