• Sat. Jun 6th, 2026
    मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…

    पालघर: चितेवर अंत्यसंस्कारासाठी रचलेला मृतदेह पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील आवंढाणी गावात घडली आहे. गावातील पाड्यात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर नदी किनारी भर पावसात अंत्यसंस्कारासाठी चिता रचण्यात आली होती. मात्र पुराच्या पाण्याच्या प्रवाहात मृतदेहच वाहून गेला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
    Monsoon 2023 : मान्सूनचा जोर पुढचे चार दिवस कसा राहणार? IMD कडून महत्त्वाची अपडेट
    मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगतच आवंढाणी गाव आहे. या गावातील डुकलेपाडा येथील विष्णू नारायण शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र गावात स्मशानभूमी नसल्याने मुसळधार पावसात अंत्यसंस्कार कसा आणि कुठे करावा असा प्रश्न निर्माण झाला. स्मशानभूमीत अभावी हात नदी किनारी उघड्यावर भर पावसात, साचलेल्या पूराच्या पाण्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ शेलार यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली.

    मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती असल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता रचलेल्या ठिकाणी पुराचे पाणी शिरले. मृतदेह जळत असतानाच पुराच्या पाण्याचा प्रवाह चिता रचलेल्या ठिकाणी जोरात आल्याने जळत असलेला मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समोर आले आहे. पुराच्या पाण्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

    चंद्रपूर शहरात ८ ते १० फूट पाण्याचा वेढा, नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

    दरम्यान राज्यात पावसाचा जोर कायम आहे. तसेच पालघरमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघरमध्ये अनेक गावांना पावसाचा फटका बसला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed