• Sat. Sep 21st, 2024
Mumbai News: मुंबईकरांनो काळजी घ्या, H3N2 च्या रुग्णांमध्ये वाढ; गंभीर आहेत लक्षणं

मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊन एक महिना झाला आहे. पावसाळा आला की अनेक संसर्गजन्य आजार आणि रोगराई पसरण्यास सुरुवात होते. अशात फ्लूसारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये किमान ५०% वाढ झाल्याची आणि श्वसनाच्या नमुन्यांची उच्च टक्केवारी फ्लूसाठी सकारात्मक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. प्रौढ आणि लहान मुलांमध्येही ताप, सर्दी आणि खोकला तर क्वचित प्रसंगी पोटाच्या समस्या समोर येत आहेत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ८ ते १५ दिवसांपर्यंत दीर्घकाळ फ्लूचा त्रास होत असल्याचे रुग्ण समोर येत असून यामुळे अशक्तपणा येत असल्याचं समोर येत आहे. यामुळे डॉक्टरांकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, हा त्रास इन्फ्लूएंझा ए व्हायरस उपप्रकार H3N2 असल्याचं दिसतं असलं तरी इन्फ्लूएंझा बी व्हायरस देखील सध्या पसरत आहे.

Mumbai Rains Alert : मुंबईकरांसाठी २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून या भागांना अतिवृष्टीचा इशारा
लीलावती हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ वसंत नागवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामी फ्लूच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, “बहुतेक रुग्णांची H3N2 ची चाचणी सकारात्मक आली आहे. डॉक्टरांना काही रूग्णांना रूग्णालयात भरती केले आहे. तर बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना कॉमोरबिडीटी आणि फ्लूची गंभीर लक्षणे आहेत. पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी ऑसेल्टामिवीर वेळेवर सुरू करणे महत्वाचे आहे.” असंही नागवेकर यांनी सांगितलं.

उपचारात्मक फायदे जास्तीत जास्त करण्यासाठी लक्षणे दिसू लागल्यानंतर ४८ तासांच्या आत ओसेल्टामिविर सुरू केले पाहिजे. “एकदा H3N2 किंवा H1N1 संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर, विलंब न करता ओसेल्टामिवीर उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे, अशीही माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

मार्चमध्ये, H3N2 प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, ज्यामुळे राज्यात H3N2 आणि कोविड-19 च्या एकत्रित संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली. ब्रीच कँडी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ हेमंत ठाकर म्हणाले की, फ्लूचा हंगाम पुन्हा सुरू झाल्याची चिन्ह आहेत. अनेक फ्लू रूग्णांमध्ये श्वसन आणि जठरासंबंधी दोन्ही लक्षणे दिसून येत आहेत. H3N2 आणि इन्फ्लूएंझा बी विषाणू वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णांना ३-४ दिवस सतत उच्च ताप येतो, तसेच शरीरात तीव्र वेदना आणि अशक्तपणा येतो.

फ्लूचा संसर्ग लहान मुलांपर्यंतही मोठ्या प्रमाणात पसरत आहे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ बकुल पारेख यांनी दिली. गेल्या आठवड्यात त्यांच्या बाह्यरुग्ण विभागात ५०% वाढ झाली आहे. “मुले सर्दी, खोकला, ताप आणि लूज मोशनसह मोठ्या संख्येने येत आहेत. लहान मुलं बहुतेक ५-७ दिवसांत बरी होतात, परंतु अनेकांचा खोकला लवकर जात नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे आणि उपचार पद्धती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed