• Sat. Mar 7th, 2026

    समृद्धीवरील अपघात टाळण्याचा प्रयत्न, रस्ते संमोहन कमी व्हावं म्हणून MSRDC चं पाऊल, पण..

    समृद्धीवरील अपघात टाळण्याचा प्रयत्न, रस्ते संमोहन कमी व्हावं म्हणून MSRDC चं पाऊल, पण..

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रस्त्याच्या दुतर्फा विविध सुविधाच नसल्याने सलग सहा-सहा, आठ-आठ तास गाडी चालवून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर चालक रस्ते संमोहनाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा विविध सोई-सुविधा उभ्या करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. परंतु, या सुविधांसाठी कंत्राटदारच मिळत नसल्याने महामंडळाला दुसऱ्यांदा निविदा काढावी लागली आहे.

    मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे एकूण ६०२ किमीचे दोन टप्पे आतापर्यंत सुरू झाले आहेत. डिसेंबरमध्ये उद्घाटन झाल्यानंतर आतापर्यंत या महामार्गाने शंभरावर बळी घेतले आहेत. सुविधांचा अभाव, हे या अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्यासाठीच अशा एकूण १६ ठिकाणी सुविधा उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेब्रुवारीत निविदा काढली गेली. त्यात केवळ एकाकडून प्रतिसाद आला. परिणामी आता महामंडळाला पुन्हा दुसऱ्यांदा निविदा काढावी लागली आहे.

    अशाप्रकारच्या सुविधांना ‘वे साइड अॅमेनिटीज’ संबोधले जाते. त्यामध्ये इंधन पंपांपासून ते हॉटेल, रेस्टॉरंट, स्वच्छतागृह, खरेदीची ठिकाणे, वाहन दुरुस्ती केंद्र आदींचा समावेश असेल. याअंतर्गत महामार्गावरील आमने, मराळ, डवाळा, मांडवा, दाव्हा, शिवनी, रेंकापूर आणि वायफळ या आठ ठिकाणी मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबई, या दोन्ही बाजूने अर्थात १६ ठिकाणी अशा सुविधांची उभारणी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी महामंडळाने निविदा काढली असून, २६ जुलै निविदेची अंतिम तारीख आहे.
    टीम इंडियासाठी गुड न्यूज! भारताची ताकद ‘तिपटीने’ वाढणार; हे खेळाडू संघात करणार पुनरागमन
    या अंतर्गत या प्रत्येक ठिकाणी चार हेक्टर जागेवर सुविधा उभ्या होणार आहेत. प्रत्येक जागेसाठी किमान ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. संबंधित कंत्राटदाराला पाच वर्षांच्या कालावधीत या सुविधा टप्प्याटप्प्याने उभ्या करायच्या आहेत.
    शिंदे सरकारमध्ये नवा भिडू, अधिवेशनात विरोधकांची कसोटी, सत्ताधाऱ्यांची या मुद्यांवर कोंडी करण्याची संधी

    किमान रक्कम मोठी

    वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग वापरणाऱ्या वाहनांची संख्या काहीशी कमी झाला आहे. सद्यस्थितीत दररोज सरासरी १० हजार वाहने ये-जा करीत आहेत. या दृष्टीने सुविधा उभ्या झाल्यास त्यांचे वापरकर्ते असतीलच. मात्र, सुविधा उभारणीसाठी किमान ५० कोटी रुपये गुंतवणुकीचा आकडा मोठा आहे. ५० कोटी रुपये किमान गुंतवून त्याचा परतावा मिळेल अथवा नाही, किंवा कधीपर्यंत मिळेल, याबाबतच्या साशंकतेमुळेच सुविधा उभे करणाऱ्या मोठ्या कंपन्या फारशा उत्सुक नाहीत, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

    विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? उदयनराजेंनी सांगितला भलताच आकडा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed