• Sat. Sep 21st, 2024
भाजपनं घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा, उद्धव ठाकरेंची सडकून टीका

यवतमाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंनी यतवमाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र हा आपलाच आहे, कुठुनंही सुरुवात केली तरी इथूनचं का केली हा प्रश्न विचारला जाणार, इथून सुरुवात केली कारण पोहरादेवीचं दर्शन घ्यायला यायचं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या मनात मविआच्या सभा झाल्या त्यावेळी एक सभा इथं घ्यावी असं होतं. पण ऊन असल्यानं सभा लांबणीवर टाकल्या. पोहरादेवीला यायचं हे अनेक दिवसांपासून माझ्या मनात होतं, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीची फूट जशी दिसते तसं बघतो. शिवसेना फोडली गेली, यापूर्वी पक्ष फोडला जायचा आता पक्ष पळवला जातो. पण तुम्ही पाहताय लोकांचा प्रतिसाद वाढलेला आहे. कुठंही गेलो तरी लोकं येऊन उद्धवजी जे काही घडतंय ते वाईट आहे, देशासाठी घातक आहे, असं म्हणतात. पण आम्ही तुमच्यासोबत आहात असं लोक सांगत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेले वर्षभर वेगवेगळ्या भागातील शिवसैनिक येऊन भेटत आहेत. मी जाहीर सभा न घेता कार्यकर्त्यांना भेटत आहे. कार्यकर्त्यांना भेटून बोलावं, असा प्रयत्न आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुप्रीम कोर्टानं स्पष्ट निकाल दिलेला आहे. त्याच्या निकालाच्या चौकटीबाहेर निकाल घेतला गेला तर सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षात इनकमिंग देखील सुरु आहे. सांगली, सातारा आणि सोलापूरची लोकं आली. शिवसेनेत नवी चेहरे येत आहेत. नवीन चेहऱ्यांना चांगली संधी मिळते आहे. नितीन देशमुखांनी चांगली मांडणी केली होती. ज्यांना कापणी करुन नेलेय त्यांना हमीभाव मिळतोय का बघा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. त्यांनी घरात जे बाजारबुणगे घुसवून घेतले आहेत, त्यांचा सांभाळ करावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी जर तरच्या प्रश्नावर बोलत नसतो. बाळासाहेबांना अटक करायला निघालेल्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत, अशी टीका केली जायची पण तुमचं काय असा सवाल ठाकरेंनी केला.
Nashik: ‘टीचर ऑफ द मिलेनियम’ ओळख असणारे डॉ. मो. स. गोसावी काळाच्या पडद्याआड
सत्तेच्या साठमारीत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालंय. पाऊस न झाल्यानं हा पेरा हाती लागतोय की वाया जातोय हे समजत नाही. शेतकऱ्यांना खरंच पीक कर्ज मिळतेय का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. विकेल ते पिकेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. करोनाचं संकट आलं, आजारपण होतं त्या दरम्यान बैठका सुरु होत्या. पण त्या बैठका शेतकऱ्यांसाठी घेतल्या असत्या तर बरं झालं, असतं उद्धव ठाकरे म्हणाले.
IND vs WI मालिका कोणत्याच स्पोर्ट्स चॅनेलवर दिसणार नाही! कुठे पाहाल LIVE स्ट्रीमिंग, जिओ सिनेमा की…?
अमित शाहांसोबत अडीच वर्ष अडीच वर्ष भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला होता. पोहरादेवीच्या साक्षीनं सांगतो. भाजपचा जुना कार्यकर्ता पाहुण्यांच्या सरबराईत रंगला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ज्यापद्धतीनं शिवसेना फोडली ते मैत्रीचं लक्षण असेल, असं वाटतं का, असं उद्धव ठाकरेंनी विचारलं.
किरण लहामटेंनी फोन बंद केला, अज्ञातस्थळी रवाना झाले पण अजित पवारांच्या माणसांनी गाठलंच, अखेर मोठा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed