• Sat. Sep 21st, 2024

करोनापेक्षा अपघाती मृत्यू अधिक; या जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, ५ महिन्यांत १५५ जीव दगावले

करोनापेक्षा अपघाती मृत्यू अधिक; या जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, ५ महिन्यांत १५५ जीव दगावले

गजानन धांडे, बुलढाणा : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात रस्ते अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरीचा विचार करता दररोज एक व्यक्ती अपघाताचा बळी जात आहे. करोनाच्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत सुमारे ७०० मृत्यूची नोंद झाली होती. या आकड्यांची तुलना करता अपघातील मृत्यूची संख्या करोनापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असून उपाय योजण्याची मागणी जोर धरत आहे.समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या वाढू लागली आहे. अनेकांचे संसार या अपघातांमध्ये उद्ध्वस्त झाले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अधूनमधून कारवाई केली जाते. अपघातप्रवण स्थळांवर जनजागृतीही केली जाते. ‘ब्लॅक स्पॉट’ निर्धारित करण्यात आले आहेत. तरीही अपघात थांबत नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर महामार्गांवर या वर्षातील सुरुवातीच्या पाच महिन्यांत २५५ अपघातांची नोंद आहे. राष्ट्रीय महामार्गावर ४४ अपघातात ६२, राज्य महामार्गावर नऊ अपघातांमध्ये १४ आणि इतर मार्गावर ७२ अपघातांमध्ये ७९ जण मृत झाले आहेत. यामध्ये १३१ पुरुष व २४ महिला असे एकूण १५५ दगावले आहेत. गंभीरित्या जखमी झाल्याची संख्या ६८ तर किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ९४ आहे. या पाच महिन्यांमध्ये केवळ आठ अपघातांमध्ये कुणालाच दुखापत झालेली नाही. हे अपवाद वगळता दिवसाला एक जण रस्ते अपघातात मृत्यू पडल्याची सरासरी नोंद शासन दप्तरी आहे.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून नागपूर-मुंबई प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न झाला. शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कुठल्याही अडथळ्यांविना गाडी चालविली जात असल्याने वेग वाढतो. हाच वेग नंतर अपघातासाठी कारणीभूत ठरतो. आता अनेक घरांमधून नकोच तो मार्ग असाही सूर उमटू लागला आहे. ही बाबही लक्षात घेण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

अपघातील मृत्यूचा आलेख
महामार्ग अपघात संख्या मृत्यू
राष्ट्रीय महामार्ग ४४ ६२
राज्य महामार्ग ०९ १४
इतर मार्ग ७२ ७९

अपघातातील जखमी…
महामार्ग अपघात संख्या गंभीर जखमी

राष्ट्रीय महामार्ग १४ २३
राज्य महामार्ग ५ ५
इतर मार्ग ४८ ४०

नाशिकमधील पेठ महामार्गावर एसटी अन् सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात

प्रसंगावधानाने वाचविले ६० प्रवासी

बुलढाणा : चिखलीकडून बुलढाण्याकडे निघालेली एसटीची बस हातणीजवळील चढावरून चढत असतानाच ब्रेक फेल झाले. अशाही परिस्थितीत न डगमगता चालक दिलीप इंगळे यांनी घाट वळणावरून मागे खड्ड्याकडे वळवत छोट्या नालीत बस उतरविली. यामुळे तब्बल ६०हून अधिक प्रवाशांचा जीव वाचला. राज्यभरातील एसटी बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक खिळखिळ्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. यातच बुलढाणा आगाराची चिखली-बुलढाणा बस हातणीच्या पुढे घाट वळण चढत होती. चढावर असल्याने बस पहिल्या गिअरमध्ये होती. अचानक काही तरी तुटल्याचा आवाज झाला आणि बस पुढे जाण्याऐवजी मागे येण्यास सुरुवात झाली. त्यातच पाठीमागून येणारे दुचाकीस्वार तसेच अन्य वाहनांना चुकवत चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले. बस अचानक बंद पडली आणि स्टिअरिंगदेखील जाम झाले. तरीदेखील चालकाने बस थांबवून प्रवाशांचा जीव वाचविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed