• Sat. Sep 21st, 2024
आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल, जाहिरातवादावरुन फडणवीसांना टोला

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईतील वरळीमध्ये राज्यव्यापी पदाधिकारी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळपासून सुरु झालेल्या सत्रात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि सुषमा अंधारे यांनी मार्गदर्शन केलं. आदित्य ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आजपासूनचे तीन दिवस महत्त्वाचे असून २० जूनचा दिवस हा जागतिक खोके दिवस असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तर, उपमुख्यमंत्र्यांनी सेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारं ट्विट आजचं केलं, त्याचं कारण दिल्लीवरुन आदेश आला असावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आज फादर्स डे असून गेल्या वर्षी माझे वडील चोरण्याचा प्रयत्न झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, काही काही लोकांनी जाहिरातीची धास्ती घेतली आहे, त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आजचं दिल्या आहेत. घटनाबाह्य सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आजच दिल्या आहेत. २० जून जागतिक खोके दिन आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडी सरकारतर्फे सुवर्णकाळ आणायचा प्रयत्न करत होतो. देशातल्या टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सलग दोन वर्ष येत होतं, असंही ते म्हणाले.
अल्पवयीन मुलगी घरी परतली नाही, शोध सुरु मग भावाच्या मोबाईलवर व्हॉईस मेसेज – मला काही जण…
सरकार पाडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे, असं विचारलं तर उद्धव ठाकरे यांचं नाव सांगितलं जातं. काही लोक दुसऱ्यांचे वडील देखील चोरतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जास्तीत जास्त महिला नगरसेवक झाल्या, महापौर देखील शिवसेनेकडून झाल्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही काय केलं हे ज्या प्रमाणं दाखवतो तसं जे सोडून गेले त्यांनी देखील दाखवावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
जबाबदारी नसलेलं शोभेचं पद नको, माझी घुसमट मीच थांबवतो; उद्धव ठाकरेंना पत्र धाडत शिशिर शिंदेंचा जय महाराष्ट्र
एका वर्षात गद्दारांनी मुंबईत काय केलं ते सांगावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी लंडनमध्ये ५० खोके म्हटल्यावर एका व्यक्तीनं ५० खोके म्हटल्याची आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. समाज पुढं न्यायचं असलं तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

पवारांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण; निशाणा नेमका कोणावर? राजकीय वर्तुळात चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed