• Sat. Sep 21st, 2024
यात्रेला पोहोचण्याआधीच मुंबईकर कुटुंबावर काळाचा घाला, दीर-वहिनीसह चौघांचा मृत्यू

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गावच्या पारंपरिक यात्रेला पोहोचण्याआधीच मालाड व बोरिवलीतील चौघांवर काळाने घाला घातला. या रस्ता अपघातात मालाड येथे वास्तव्यास असलेल्या काशिद कुटुंबातील दीर व वहिनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सांगली जिल्ह्यातील विट्याजवळ सातारा-विटा राज्य महामार्गावर झाला.मुंबईतील मालाड पूर्व येथील नोबेल हाईट सोसायटीत राहणारे सदानंद दादोबा काशिद हे पत्नी सुनीता, सख्खा भाऊ चंद्रकांत दादोबा काशिद व अशोक सूर्यवंशी यांच्यासह विट्याजवळील गव्हाण येथील गावी असलेल्या वार्षिक जत्रेसाठी जात होते. यासाठी त्यांनी खासगी गाडी केली होती. मात्र विट्याजवळ असताना एका ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना समोरुन जोरदार धडक दिली.

Cobra Bite: दोन रुपयाचं नाणं काढताना साप चावला, चिमुरडा दिवसभर गप्प, संध्याकाळी पोरगं हातचं गेलं
त्यामध्ये सदानंद यांच्या पत्नी सुनीता, भाऊ चंद्रकांत व अशोक सूर्यवंशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच मागाठाणे येथील रहिवासी असलेले कार चालक योगेश विलास कदम हेदेखील बसच्या धडकेत चेंगरले गेल्याने जागीच मृत पावले.

समृद्धी महामार्गावर ट्रकला अपघात, बिअरचे बॉक्स घेण्यासाठी तरुणांपासून वृद्धांची गर्दीच गर्दी!

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चारचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीतून प्रवास करणारे चौघे जण जागीच मृत्युमुखी पडले. गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने सदानंद काशिद बचावल्याची माहिती. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Thane News : धडाम्! देशकर कुटुंबाच्या गॅलरीत मोठ्ठा आवाज, पाहिलं तर पाचव्या मजल्यावरुन…

काशिद कुटुंबिय अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. सदानंद व सुनीता यांना अविनाश नावाचा मुलगा असून तो जम्मूतून गुरूवारी रात्री पोहोचला. त्यांना दोन मुली असून एक गावी व एक मुंबईत असते. तर चंद्रकांत यांना मिलिंद नावाचा एक मुलगा असून तोदेखील गुरूवारी रात्री मुंबईत परतला. त्यांना एक मुलगीदेखील असून ती गावी असते. काशिद कुटुंबियांवर मुंबईतच शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed