त्यामध्ये सदानंद यांच्या पत्नी सुनीता, भाऊ चंद्रकांत व अशोक सूर्यवंशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच मागाठाणे येथील रहिवासी असलेले कार चालक योगेश विलास कदम हेदेखील बसच्या धडकेत चेंगरले गेल्याने जागीच मृत पावले.
समृद्धी महामार्गावर ट्रकला अपघात, बिअरचे बॉक्स घेण्यासाठी तरुणांपासून वृद्धांची गर्दीच गर्दी!
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चारचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीतून प्रवास करणारे चौघे जण जागीच मृत्युमुखी पडले. गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने सदानंद काशिद बचावल्याची माहिती. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
काशिद कुटुंबिय अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. सदानंद व सुनीता यांना अविनाश नावाचा मुलगा असून तो जम्मूतून गुरूवारी रात्री पोहोचला. त्यांना दोन मुली असून एक गावी व एक मुंबईत असते. तर चंद्रकांत यांना मिलिंद नावाचा एक मुलगा असून तोदेखील गुरूवारी रात्री मुंबईत परतला. त्यांना एक मुलगीदेखील असून ती गावी असते. काशिद कुटुंबियांवर मुंबईतच शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.