• Sat. Sep 21st, 2024

खारघर दुर्घटनेचा प्रश्न उच्च न्यायालयात; शिंदे, फडणवीसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी

खारघर दुर्घटनेचा प्रश्न उच्च न्यायालयात; शिंदे, फडणवीसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी

मुंबई : ‘नवी मुंबईतील खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यादरम्यान उष्माघाताने व चेंगराचेंगरीने १४ जणांचा नाहक मृत्यू झाला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत’, अशा विनंतीची फौजदारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या शैला कंथे यांनी अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली असून या आठवड्यात किंवा २ मे रोजी याप्रश्नी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबरोबरच आरोग्यमंत्री, पालकमंत्री, नवी मुंबई पोलिस आयुक्त, राज्याचे पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, आयएएस अधिकारी डॉ. योगेश म्हसे, कोकण विभागीय आयुक्त, कन्सेप्ट कम्युनिकेशनचे अध्यक्ष विवेक संचेती व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारविजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

तीन वाहनांचा भीषण अपघात, प्राध्यापकाचा मृत्यू , दुसऱ्याच दिवशी होता रिटायरमेंटचा कार्यक्रम
‘सध्या करोनाचे संकट असतानाही आणि प्रचंड तापमान असूनही सरकारने भर उन्हात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. इतकेच नव्हे तर जवळपास दहा लाख अनुयायी जमले असूनही त्यांच्याकरिता पुरेसे पाणी, अन्न इत्यादीची सुविधाच दिली नाही. शिवाय १४ कोटी रुपये खर्चूनही मंडपही घालण्यात आला नाही. त्यामुळे १४ जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या सर्वांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा; पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार
‘मृतांच्या कुटुंबांना ५० लाखांची भरपाई मिळावी’

‘प्रत्येक मृताच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची भरपाई व जखमींना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. तसेच याचिका निकाली निघेपर्यंत हीच अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.

रिफायनरी सर्वेक्षण: मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed