पुण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.लोकमान्य टिळकांचे खापरपणतू रोहित टिळक यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.गेल्या काही काळापासून रोहित टिळक पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती.लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरून रोहित टिळक यांनी खंत व्यक्त केलेली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यावरून त्यांच्यात व काँग्रेसमध्ये दुरावा आलेला. पुढील काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.