पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता भारतातही पाहायला मिळतेय. महाराष्ट्राला देखील या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. राज्यात घरगुती वापरासाठीच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालेय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही मोठी भीती व्यक्त केलीय. राज्यातील फळ उत्पादक, भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून दुर्दैवाची परिस्थिती ओढावल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. वीज व्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता जयंत पाटलांनी व्यक्त केली.