त्यामुळे वेचणी अभावी शेतामध्ये झाडाला शिल्लक असलेला कापूस आता पिवळा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस पिवळा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये परत अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर दुसरीकडे शेतात असलेला कापूस वेचणीसाठी मजूर सापडत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत असल्याचे चित्र परभणी जिल्ह्यामध्ये पहावयास मिळत आहे.
दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस ठेवला घरात
यावर्षी कापसाला अपेक्षित असा बाजारपेठेमध्ये भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परभणीमध्ये सध्या आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाचे खरेदी केली जात आहे. कापसाचे भाव काही दिवसांनी वाढतील या प्रतीक्षेमध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. मात्र भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे भाव वाढतील का अशी चर्चा आता शेतकरी करताना दिसत आहेत.