सोमवारी लांजा तालुक्यातील वाघण बौद्धवाडी येथील येथील राहणारे कुमारी साघवी महेंद्र जाधव (वय-१५), यथात महेंद्र जाधव (वय-१३ वर्ष) ही दोन अल्पवयीन मुले संध्याकाळी राजापूर एस.टी.डेपो समोर एका बाजुस बसलेली दिसली. यावेळी राजापूर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी यांनी या मुलांकडे विचारणा केली. यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
रत्नागिरीतील हजारोंची किंमत असलेला हापूस खाण्याचा पहिला मान पुणेकरांना; मानाची पहिली पेटी पुण्याला रवाना
यावेळी या मुलांनी सांगितले की, आपली आई चार वर्षांपूर्वी घर सोडून गेली. ती पुणे येथे असून आम्हाला तिची आठवण येत असल्याने तिच्याशी संपर्क करुन आम्ही पुणे येथे जात आहोत असे सांगितले. यावेळी त्यांचेकडे त्यांच्या वडिलांचे नाव विचारले असता मुलांनी महेंद्र गणपत जाधव (रा. वाघण गाव बौद्धवाडी ता. लांजा) असे असल्याचे सांगितले. वडील कोकण रेल्वेत कामाला असल्याचंही या मुलांनी सांगितलं. यानंतर दामिनी महिला पोलिसांच्या पथकाने तात्काळ वडिलांना फोनवर संपर्क करुन बोलावुन घेतलं. वडील आल्यावर दामिनी पथक मुलांना वडिलांसह घेवून पोलीस ठाण्यात आले.
राजापूर पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी मुलांना आणि वडिलांना समजावून सांगितले आणि मुलांचे मन परिवर्तन करुन दोन्हीही मुलांना सुरक्षितरित्या त्यांचे वडील महेंद्र गणपत जाधव, चुलते शिलेंद्र लांजा तालुक्यातील वाघण गावातील बौद्धवाडी येथे राहणाऱ्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण करुन सांभाळ करण्याबाबात योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. राजापूर पोलिसांच्या महिला दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघालेली मुले पुन्हा घरी सुखरूप परतली आहेत. यामुळे राजावर पोलिसांच्या दामिनी पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे