• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं: महाडिक-पाटील वाद शिगेला, दोघेही बिंदू चौकात आले मात्र…

कोल्हापूर :माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलेलं चॅलेंज आमदार सतेज पाटील गटाने स्वीकारल्याने कोल्हापुरातील राजकारण आज दिवसभर चांगलच तापल होतं. प्रचार शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार अमल महाडिक यांनी बिंदू चौकात येऊन समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान सतेज पाटील यांना दिलं होतं. या चर्चेसाठी महाडिकांनी आज संध्याकाळी साडेसात वाजेची वेळ दिली होती. त्यांचं हे आव्हान सतेज पाटील यांनी स्वीकारत थेट अमल महाडिक यांना २०१९ च्या निवडणुकीत हरवून आमदार झालेले ऋतुराज पाटील यांना पाठवून दिलं. अशातच आज आंबेडकर जयंती असल्याने बिंदू चौकात आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. दोन्ही गटातील कार्यकर्ते देखील येथे आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.बिंदू चौकात तणावपूर्ण वातावरण

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या कोल्हापूर सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाटील आणि महाडिक गटाकडून सुरू आहे. कालच निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर आज महाडिक गटाकडून प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी महाडकांनी माजी आमदार सतेज पाटील यांना संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात येऊन समोरासमोर चर्चा करावी असे आव्हान दिले होते. यामुळे सकाळपासून सतेज पाटील हे आव्हान स्वीकारणार का याची जोरदार चर्चा सुरू होती.

शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार ‘वरात’ मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी
तर महाडिक गटाकडून काउंटडाऊन देखील सुरू करण्यात आला होता अशातच सतेज पाटील यांनी माजी आमदार अमल महाडिक यांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करून आमदार झालेले ऋतुराज पाटील येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे दिवसभर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळालं. अशातच आज भीम जयंती असल्याने हजारो अनुयायी बिंदू चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्तेही येथे आल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यासाठी पोलीस प्रशासनाने देखील मोठा फौजफाटा तैनात केला आणि दोघांना एकमेकांसमोर येण्यापासून रोखलं.मात्र दोघांकडून देखील आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले.

आज आम्ही घाबरलेलो नाही ते आम्हाला भ्याले

साधारण साडेसात पावणे आठ च्या सुमारास माजी आमदार अमल महाडीक हे बिंदू चौकात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मात्र पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत पुन्हा जाण्याची विनंती केली. मात्र अमल महाडिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि नंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

कॉलेजकडे जाऊ असे सांगत युवकाला गाडीत बसवले, पुढे घडला धक्कादायक प्रकार
यावेळी बोलताना महाडिक म्हणाले, ‘ही निवडणूक कारखान्याची निवडणूक आहे. ज्या पद्धतीने राजाराम कारखान्याच्या बाबतीमध्ये मी बिंदू चौकामध्ये जाहीरपणे संपूर्ण माहिती देणार म्हटलं होतं त्यानुसार सतेज पाटील यांनी देखील त्यांच्या डी. वाय. पाटील कारखान्याबद्दल माहिती द्यावी असे आव्हान केलं. पण बंटी पाटील इथे आले नाहीत. साडेसात वाजले आहेत. मी त्यांची वाट बघतोय. आज आम्ही घाबरलेलो नाही ते आम्हाला भ्याले आहेत. डी. वाय. पाटील साखर कारखाना संदर्भात मी त्यांना जे काय प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी जाहीरपणे द्यायला पाहिजे होती. मात्र ते देऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे उत्तरं नाहीत.’ ते स्वतः न येता ते पुतण्याला पाठवत आहेत. यामुळे बंटी पाटील महाडिकाना भ्याले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करत पोलिसांमार्फत आम्हाला तेथे थांबवलं

तर महाडिक यांना पोलिसांनी विनंती करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी त्यांना पाठवून दिले. यानंतर काही वेळातच आमदार ऋतुराज पाटील देखील येथे आले आणि त्यांनी महाडिक यांच्यावर टीका केली. करेक्ट सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान मी दसरा चौकात आलो होतो. मात्र महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करत पोलिसांमार्फत आम्हाला तेथे थांबवलं. जर तुम्हाला आमच्याबद्दल भीती नव्हती तर आम्हाला साडेसात वाजता ते येऊ द्यायला पाहिजे होतं. मात्र ते घाबरले असून आता हे पूर्णपणे सिद्ध झालं आहे की महाडिक हे भ्याले आहेत अन्यथा ते आम्ही येईपर्यंत पाच दहा मिनिट थांबायचं होतं. मात्र तुमच्यामध्ये धमक नाही असे म्हणत येत्या ३ तारखेला सभासद परिवर्तन पॅनलला मतदान करत निवडून आणतील आणि महाडिक यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे ऋतुराज पाटील यांनी म्हटले आहे.

पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने केले धक्कादायक कृत्य
तर सतेज पाटील तेव्हा येथील जेव्हा खासदार धनंजय महाडिक बिंदू चौकात येतील. अमल महाडिक यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही सभासद आणि मी पुरेसे आहोत असेही ऋतुराज पाटील यावेळी म्हणाले. ते घाबरले म्हणून येथून लवकर पळ काढला, अन्यथा ते थांबले असते असे त्यावेळी ते म्हणाले. त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलं आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवलं, आम्ही त्यांना घाबरत नाही आणि सभासद त्यांचा कंडका पाडतील असा विश्वास ही ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed