चंद्रपूरचा पारा सलग तिसऱ्या दिवशी वाढला आहे. गुरुवारला ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ११ एप्रिल रोजी चंद्रपूरचे तापमान ४१ अंश सेल्सिअस होते, तर १२ एप्रिल, बुधवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारचे तापमान राज्यात सर्वाधिक होते. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ झाली. गुरुवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
चंद्रपूरपाठोपाठ जगात सेनेगलच्या कोलडा येथील तापमान ४३ अंश सेल्सिअस तर भारतातील करनूल येथील तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तापमान वाढीचे ही आहेत कारणे…
दरवर्षी चंद्रपूरचे तापमान का वाढतंय याला अनेक करणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे शहरातील प्रदूषण. शहराचं औद्योगीकरण झालं आहे. अनेक उद्योग येथे उभे झालेत. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला हे खरे मात्र त्या सोबतच प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या अतिशय गंभीर विषय असला तरी याकडे कुणी फारसं गंभीरतेने बघत नाही ही मोठी शोकांतिका.
ही आहेत करणे….
विदर्भ हा मध्य भारतात येतो. बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातील बाश्पी वारे विदर्भात पोहचत नाही. सोबतच इथं झालेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, प्रदूषण तापमान वाढीला कारणीभूत असल्याचं अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं.
गावात नळ, विहीर, बोअरवेल पण गावकरी पाणी पिणार तर नाल्यातलंच