कोट्यवधी रुपयांची भरपाई देऊनही पीडितेची दृष्टी परत येणार नाही. मात्र, सहा लाख रुपयांच्या भरपाईमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल, असे मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले. हिंमतराव सखाराम जाधव असे पीडितेचे नाव आहे. दिवाणी न्यायालयाने जाधव यांना २ लाख ५० हजार रुपयांची भरपाईही दिली आहे.
पाटील यांच्या घरातील घाण पाणी नेहमी रस्त्यावर वाहत असे. याबाबत विचारणा केल्यावर १३ एप्रिल २००४ रोजी पाटील व त्यांची पत्नी विजया यांनी जाधव व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. याचदरम्यान पाटील यांनी दगडफेक करून जाधव यांचा डावा डोळाही फोडल्याची तक्रार प्राप्त झाली. १६ मार्च २००९ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाटील यांना दोन वर्षांचा कारावास आणि १००० रुपये दंड, तर विजया हिला सहा महिने कारावास आणि १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
त्यानंतर, ३ ऑगस्ट २०१३ रोजी सत्र न्यायालयाने पाटील यांची शिक्षा कायम ठेवली. परंतु विजया यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे पाटील यांनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर जाधव यांनी विजया यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा सुधारित निकाल देऊन त्या याचिका निकाली काढल्या.
मी ३ लाख घेते असं कोणी सांगितलं?; इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर पहिल्यांदाच बोलली गौतमी पाटील