• Sun. Jun 7th, 2026

    मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी

    मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी

    Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जातो. पण महामार्गाचं काम बाकी असलं तरी आता टोला नाका सुरू कऱण्याची तयारी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

     

    मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी
    राजापूर, रत्नागिरी : मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. पण राजापूर तालुक्यातील टोल नाका उद्या म्हणजेच ११ एप्रिल मंगळवारी सकाळी सातपासून सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे, असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. टोला नाका सुरू करण्याचा हा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी हाणून पडला होता. आणि महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या टोल नाक्याकडे सगळ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे. हातिविले टोल नाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून महामार्गावरती राजापूर हातिवले येथे टोल वसुली सुरू होईल, हे जवळपास निश्चित आहे.

    कोकण रेल्वेत धक्कादायक प्रकार, चिपळूणच्या फेरीवाल्यांना मारहाण, उकळते तेल ओतण्याचा प्रयत्न
    कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टप्प्यातील जवळपास ९८.२ टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अतुल शिवनिवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली आहे. त्यामुळे आता या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सगळ्यात पहिला टोल नाका राजापूर हातिवली येथे सुरू होणार आहे.
    रेल्वेकडून गुजरात-कोकण विशेष समर स्पेशल गाड्या, ‘या’ स्थानकांवर थांबणार
    यापूर्वी २२ डिसेंबरला हा टोल नका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली होती. अनेक विषय बाकी आहेत, या टोल नाक्यापासून सहाशे मीटर अंतरावर काम सुरू आहे पाणी योजना विषय आहे. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरू होणार नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरू का? असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करण्यात आले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हातीवले येथील टोल वसूलीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने हातीविले टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed