म. टा. वृत्तसेवा, पनवेल : शहरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढू लागल्या असतानाच, सोमवार आणि मंगळवारी पाण्याचा तुटवडा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा जलवाहिनी यांची दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे, पनवेल शहरात दोन दिवस पाण्याचा तुटवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुन्या झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. यापैकी काही महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी प्राधिकरणाकडून दोन दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीमध्ये बदल करण्याचे कामदेखील करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतही पाण्याचा तुटवडा भासणार आहे.
उन्हाळ्यात देहरंग धरणाचे पाणी संपल्यानंतर तीन ते चार महिने पनवेल महापालिकेला शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी मिटावी, म्हणून पनवेल महापालिका प्राधिकरणाच्या वाहिनीवरून नवी जोडणी घेऊन आठ ते १० एमएलडी पाणी घेणार आहे. याचे कामही या शटडाऊनच्या कालावधीत केले जाणार आहे.
उन्हाळ्यात देहरंग धरणाचे पाणी संपल्यानंतर तीन ते चार महिने पनवेल महापालिकेला शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी मिटावी, म्हणून पनवेल महापालिका प्राधिकरणाच्या वाहिनीवरून नवी जोडणी घेऊन आठ ते १० एमएलडी पाणी घेणार आहे. याचे कामही या शटडाऊनच्या कालावधीत केले जाणार आहे.
ठाण्यात वातावरणं तापलं, मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर आदित्य ठाकरेंकडून नव्या लढ्याचा आगाज?
नागरिकांना आवाहन
या कामांच्या पार्श्वभूमीवर, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जल अभियंता विलास चव्हाण यांनी केले आहे. बुधवारपासून एक दिवसाआड नियमितपणे पाणीपुरवठा होईल, अशी माहिती चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितली.
