शेतकऱ्यांनी पै-पै गोळा करुन फळबागा लावल्या आहेत. अहोरात्र मेहनत करुन फळबागा जगवल्या आहेत. मात्र, अवकाळी पावसात हाता तोंडाशी आलेल्या फळबागा माती मोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
वाडी बामणी येथील बाबासाहेब उंबरदंड यांनी दिड एकरवर व्यंकट जातीचे कलिंगड लागवड केली होती. यासाठी त्यांनी पावणे दोन लाख रुपये खर्च केला होता. यातून ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळणार होते. पुढील ४ दिवसात तोडा होणार होता. मात्र, काल झालेल्या गारपिटीत कलिंगड मातीमोल झाले.तडवळा येथील सिताबाई सुरवसे, तानाजी सुरवसे, शिवाजी सुरवसे यांची द्राक्ष बाग जमिनदोस्त झाली आहे. सुरवसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
राज्यात मागील ३ ते ४ वर्षात दुष्काळाचं सावट काहीसं कमी झालं आहे. पण अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पुरत हाल झालेले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे न भरून येणारं आहे. खरं तर हा काळ रब्बीचे पिके घेण्याचा होता. मात्र, फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.