• Mon. Mar 9th, 2026
    मित्रांसोबत ते अंबाबाई मंदिरात दर्शनाला आले, रांगेत उभे असताना कोसळले, क्षणात सारं संपलं

    कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधून भाविक येत असतात. अहमदनगर येथील एका भाविकाचा आज सकाळच्या सुमारास अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. संबधित भाविकाला उपचारासाठी तात्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे. रामनाथ गबाजी जाधव वय वर्ष ६२ राहणार मोर्विस, पो. चास नळी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर असे त्यांचं नाव आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत केली आहे.

    साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला रोज लाखो भाविक येत असतात. तसेच अनेक पर्यटक पर्यटनासाठी देखील कोल्हापुरात आवर्जून येत असतात. अहमदनगर येथील रामनाथ जाधव हे आपल्या चार मित्रांसह १५ दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर गेले होते. दक्षिण भारत फिरून ते आज सकाळच्या सुमारास कोल्हापुरात आले होते.

    रामनाथ जाधव आणि त्यांचे मित्र अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहिल्यानंतर काही वेळात त्यांच्या छातीत तीव्र कळा येऊ लागल्या थोड्या वेळातच ते जागीच कोसळले. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालावली.

    धोनीला दुखापत पण नो टेंशन, CSK चा आता नवा कर्णधार असेल तरी कोण जाणून घ्या

    रामनाथ जाधव हे अहमदनगर येथे शेतकरी होते. पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह ते दक्षिण भारताच्या सहलीत सहभागी झाले होते. ते सहलीत उत्साहाने सहभागी झाले होते. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगेत त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातचं त्यांचं निधन झालं. रामनाथ जाधव यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार असल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्या मित्रांनी दिली. तर या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा धक्का बसण्याच्या घटना वाढल्या आहेत.

    तिढा सुटला… पाकिस्तान भारतात न येताही वनडे विश्वचषक खेळणार, जाणून घ्या काय आहे फॉर्म्युला

    ज्योतिरादित्य नाव कसं पडलं?; ज्योतिबाच्या दर्शनानंतर शिंदेंनी सांगितला किस्सा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed