• Sat. Sep 21st, 2024
आईने तेराव्याला सोबत न नेल्याचा राग, दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

अकोला : आईने सोबत नेलं नाही, त्या रागातून पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला शहरातील मोठी उमरी भागातील विठ्ठल नगरात ही घटना घडली आहे. युवतीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. आई अकोला जिल्ह्यातील अकोट येथे तेराव्याच्या कार्यक्रमात जात होती. त्यावेळी मुलीने सोबत येण्याचा हट्ट केला, मात्र आईने सोबत नेण्यास नकार दिल्याच्या रागातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचं समजतं.

नेमकी काय संपूर्ण घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय विद्यार्थिनी मूळ वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी आहे. दरम्यान शालेय शिक्षणासाठी ती आणि तिचा भाऊ अकोला शहरात मामाकडे राहतात. तर तिचे वडील अमरावतीत कामाला असतात.

दरम्यान काल रविवारी सकाळी जिल्ह्यातील अकोटला नातेवाईकांकडे तेराव्याचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुलीची आई सकाळीच अकोट गेली, तर भाऊ शिकवणी क्लासला गेलेला होता. यावेळी विद्यार्थिनी घरी एकटीच होती.

दुपारी तिचा लहान भाऊ घरी परतला असता घराचा दरवाजा आतून लावलेला होता, त्याने बराच वेळ दरवाजात उभं राहून ताईला हाक मारली, परंतु आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. अखेर त्याने खिडकीतून डोकावून पाहिलं असता ती ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

लागलीच त्याने शेजारच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी तात्काळ दरवाजा तोडून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

VIDEO | आरडाओरड ऐकून गेली न् जीवाला मुकली, ग्रँट रोडमधील हल्ल्यात मयत तरुणीवर भावपूर्ण अंत्यसंस्कार

आईने सोबत नेलं नाही, म्हणून….

मयत विद्यार्थिनी ही दहाव्या इयत्तेत शिकत होती, नुकतीच तिने परीक्षा दिली असून २५ मार्चला दहावीचा शेवटचा पेपर होता. परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईकांकडे अकोटला तेराव्याचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला तिची आई जाणार होती. त्यावेळी सोबत यायचा तिने हट्ट धरला, परंतु आईचा सोबत न्यायला नकार होता अन् तिला घरीच ठेवले. याच गोष्टीचा मनात राग धरून तिने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांसह नातेवाईक सांगतात. तरीही अद्यापपर्यंत आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

दरम्यान विद्यार्थिनी अभ्यासात अतिशय हुशार होती. तबला पेटी, संगीत गायनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन ती करायची. लग्न समारंभ असले की तिथे संगीत कार्यक्रम देखील घ्यायची, म्हणजेच तिला संगीताची खूप आवड होती.
आज जरा वेगळ्या पद्धतीने करुयात, महिलेचा नकार; तरुणाने जीव घेतला, मग मृतदेहासोबत शरीरसंबंध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed