• Sat. Sep 21st, 2024
कंपनीतून हाफ डे घेतला, गावी जाताना काळाची झडप; लेकरांना बघण्यापूर्वीच दोन मित्रांचा मृत्यू

जळगाव : भरधाव ऑईलच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. संदिप मानसिंग शिरसाम (वय २४), बसंत मुन्ना वरखेडे (वय २८, दोन्ही रा. धमण्या. जि. बैतूल, मध्यप्रदेश) असं दोन्ही मयत तरुणांची नाव आहेत. कंपनीत अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन दोन्ही तरुण गावी निघाले होते. मात्र, रस्त्यात दोघांवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली आणि त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुळ मध्यप्रदेशातील आदीवासी तरुण संदिप मानसिंग शिरसाम आणि वसंत मुन्ना वरखेडे असे दोघेही एमआयडीतील वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते. एमपी ४८ एमआर ५३९७ या क्रमाकांच्या दुचाकीने संदीप आणि बसंत हे दोघंही कंपनीत अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन रविवारी दुपारी गावी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या एमएच ०४ डीएस २२१७ या क्रमाकांच्या भरधाव ऑईलच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

या धडकेत दुचाकीवरील संदीप आणि बसंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन आणि रुपेश साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. महामार्गावरील मयत तरुणांचे मृतदेह तातडीने खासगी गाडीतून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून संदीप आणि बसंत जळगावात रोजगारासाठी आले होते. हे दोघं जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते. रविवारी अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन दोघेही गावी निघाले. गावी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी ते रात्रपाळीत कंपनीत कामाला येणार होते. मात्र, गावी घरी पोहचण्यापूर्वीच दोघांना कंपनीतून निघाल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच मृत्यूने गाठले.

मयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ आणि दोन विवाहित बहीणी आहेत. तर बसंत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहिण, असा परिवार आहे. दोन्ही तरुणांच्या चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपलं आहे. जळगावातील नातेवाईकांच्या माध्यमातून अपघाताची माहिती मयताच्या कुटुंबियांना देण्यात आली असून दोघांचे कुटुंबीीय मध्यप्रदेशातील बैतुल येथून जळगावकडे येण्यासाठी निघाले आहेत. एकाच अपघातात दोघा मित्रांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जसं मला सांभाळलं तसं उद्धवला व आदित्यला सांभाळा; ठाकरे गटाकडून मालेगावात भावनिक आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed