सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी यमगर ही भावकी राहते. त्यांच्या शेतामध्ये सामायिक विहीर आहे. या विहिरीतील पाण्यावरून सकाळी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला आणि यातून एका यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी विलास यमगर व प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला.
या हल्ल्यामध्ये विलास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांचा खून करण्यात आला आहे, तर या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर जखमी झालेले आहेत.
मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत. तर दुसऱ्या यमगर कुटुंबापैकी कोणी जखमी झाले नाही, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेतली आहे.
जखमींना जत शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर या घटनेमुळे कोसारी या ठिकाणी सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही?, मुलांना कॉपी देण्यासाठी पालकांचा परीक्षा केंद्रावर गोंधळ!