Maharashtra Weather Latest Big Update : पावसाने दडी मारल्याने शहरातील हवामानातही बदल दिसतो आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून, दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. धरणे पूर्ण भरलेली असल्याने पाणीपुरवठ्याची तातडीची चिंता नाही. मात्र, हंगामाच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने घेतलेली विश्रांती शेतकरी आणि प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली आहे. पुढील चार दिवसांतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाही. आकाश अंशत: ढगाळ राहून अधूनमधून हलक्या सरी पडतील, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
पावसाकडून फारशी आशा नाही
राज्यात अजूनही एकूण १६ टक्के तूट कायम आहे. मराठवाडा विभागामध्ये ३६, तर विदर्भ विभागामध्ये २७ टक्के टक्के तूट आहे. बीड, धाराशीव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ही तूट ४० टक्के आणि अधिक आहे. सर्वाधिक ४९ टक्के तूट बीड आणि हिंगोली जिल्ह्यात आहे. पावसाळ्याचा आता शेवटचा टप्पा सुरू झाल्याने उर्वरित काळात होणाऱ्या पावसाकडून फारशी आशा नसल्याचे चित्र आहे.
Devendra Fadnavis : ‘मी शेतकऱ्यांच्या पाठीशी’; दुष्काळाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, CM फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनाच्या दीड दिवसाच्या कालावधीत पावसाने अधूनमधून हजेरी लावली. काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे शून्य, तर कुलाबा येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात कुलाबा येथे ३ तर सांताक्रूझ येथे ४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. रविवारचा एक दिवस जोरदार उपस्थिती लावून पाऊस पुन्हा फारसा नसल्याने कमाल तापमान पुन्हा ३२ अंशांहून पुढे गेले आहे.
पाण्याची स्थिती चिंताजनक
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस असला तरी इतरत्र पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. ठाणे जिल्ह्यातही सात टक्के तूट असल्याने मुंबईमध्ये पाणीपुरवठ्यावर येणाऱ्या नियंत्रणाच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाला आहे.
Manoj Jarange : ‘जरांगे यांची भाषा आक्षेपार्ह’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, मुंबईला येताना कुटुंबासह जनसमुदायाला अश्रू अनावर
पावसाने बळीराजा सुखावला
मंगळवारी दीड दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने मिरवणुका तसेच, विसर्जन घाटावर भक्तांची गर्दी दिसली. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणरायाच्या आगमनासह पावसाच्या सरी कोसळल्याने अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. रविवारी आगमनाच्या दिवशी पालघर जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी बरसत होत्या. सोमवारी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी दुपारपर्यंत पावसाचा जोर होता, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.
पालघर जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसला. रविवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र मूर्ती शाळेत गणरायाला घरी नेण्यासाठी गेलेल्या भक्तांचा जल्लोष तसूभरही कमी झाला नव्हता.
Heavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज
विसर्जन घाटावर भाविकांची संख्या लक्षणीय
सोमवारी प्राणप्रतिष्ठेवेळीही पाऊस होता, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. मंगळवार सकाळचा अपवाद वगळता तुरळक सरी कोसळल्या. पावसाने उघडीप दिल्याने दीड दिवसाची विसर्जन मिरवणूक व विसर्जन घाटावर भाविकांची संख्या लक्षणीय होती. प्रशासनाने नागरिकांना पारंपरिक वाद्य आणि आवाजाची मर्यादा न ओलांडता साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला खासगी, सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद देत आगमन, विसर्जनासाठी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले. चिखले, नरपड, घोलवड, बोर्डी यांसह अनेक गावांमध्ये टाळ मृदुंगांच्या सुरावटींवर गणरायाला निरोप देण्यात आला.
आज, बुधवार १६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर ओसरणार असून जिल्ह्यात दिवसभर उघडीप आणि काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील. हे वातावरण २० सप्टेंबरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Dighi Shipbuilding Cluster : देशात सर्वात मोठं शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारणार, 27 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
निम्मा सप्टेंबरही कोरडाच
जुलैमध्ये मुसळधार पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही हीच स्थिती कायम राहिली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत शिवाजीनगर येथे केवळ २१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पुण्यात सन २०१८नंतरचा या कालावधीत पडलेला दुसरा सर्वांत कमी पाऊस ठरला आहे. ४५ दिवसांत एकाही दिवशी दुहेरी आकड्यात पाऊस झालेला नाही.
जुलैतील विक्रमी पावसाचा मोठा वाटा
जुलैतील धडाक्यानंतर शहरात पावसाने घेतलेली विश्रांती आता अनेकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. या वर्षीच्या हंगामात एक जून ते १५ सप्टेंबरदरम्यान पुण्यात ६९३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात जुलैतील विक्रमी पावसाचा मोठा वाटा आहे. जूनमध्ये ६४ मिमी, जुलैमध्ये ५०८ मिमी, ऑगस्टमध्ये ८०.८ मिमी, तर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात २१.८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. एकूण हंगामी आकडे समाधानकारक दिसत असले, तरी दीड महिन्यापासून पावसाची स्थिती चांगली नाही. पोषक घडामोडींअभावी मध्य महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडत नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.
