NCP Politics : सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळली असली, तरी पक्षातील धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळेच काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येते. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाला आलेली मरगळ घालविण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळली असली, तरी पक्षातील धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळेच काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे ‘रिलॉन्चिंग’ केले जाणार असल्याचे समजते. अजित पवार असताना ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा राष्ट्रवादीच्या सगळ्या जाहीर कार्यक्रमात दुमदुमत असे. मात्र आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.
प्रशांत किशोर यांना जबाबदारी
राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार व त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांनीच खांद्यावर घेतली आहे. पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी द्यायला पाहिजे, अशी भूमिका आता पक्षात घेतली जाऊ लागली आहे. त्यातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाला आलेली मरगळ घालविण्याची जबाबदारी सोपविल्यानंतर पक्षात संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
Bihar Politics : जेडीयू पक्षाचे नाव दोन दशकांनी बदलण्याची चिन्हं, नितीश कुमार यांच्या नावाचाही समावेश होणार, फुटीच्या चर्चांना जोर
तटकरे-पटेलांबाबत संदिग्ध भूमिका
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे अद्याप त्या पदावर आहेत किंवा कसे याबाबत पक्षातून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत प्रफुल पटेल यांचे नाव राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नोंदवलेले नाही. तसेच सुनील तटकरे यांच्याकडील प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीबाबतही पक्षात दोन मतप्रवाह स्पष्ट दिसू लागले आहेत.
आमदारांमध्ये अस्वस्थता
प्रशांत किशोर यांनी पक्षाला पुन्हा एकदा उभारी यावी, म्हणून विविध उपाय सुचवल्यानंतर त्याविषयीही पक्षात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याचा कार्यभार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतल्यानंतर ते खाते पुन्हा मिळावे याची पक्षनेतृत्वाची इच्छा असली, तरी तसे होण्याची काहीही चिन्हे नाहीत. परिणामी पक्षातील आमदारांना छोट्या-मोठ्या कामांसाठी मंत्रालयात खेटे घालावे लागत असल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Rishabh Sambyal : राष्ट्रपतींचे ADC झाल्याने अविवाहित राहावं लागलं, मेजर ऋषभ संब्यालने सांगितली अट, द्रौपदी मुर्मू म्हणजे साक्षात आईचं रुप
राज्यभर दौरे, महिलांचा सहभाग
या सगळ्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, आता प्रशांत किशोर व त्यांच्या टीमने दिलेल्या आराखड्यानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ‘रिलॉन्चिंग’ ताकदीने करायचे, तसेच सुनेत्रा पवार यांचे महाराष्ट्रभर दौरे आयोजित करायचे. या दौऱ्यांपूर्वी त्यांच्या सभांना महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे लक्ष द्यायचे, अशी रणनीती ठरली असल्याचे बोलले जाते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा