पोलिसांनी सराईत चोरट्यांना जेरबंद केलं आहे. हे आरोपी चेन चोरी करायचे. चेन चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी युद्ध पातळीवर कारवाईला सुरुवात केली. पोलिसांना या कारवाईत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : शहरातील वाढत्या चेन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मकोकासह पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत इराणी चेन चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 27 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत 34 लाख 33 हजार रुपये, जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत चेन चोरीचे तब्बल 15 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना निष्पन्न करण्याचे आदेश गुन्हे शाखेतील पथकांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?
पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन चोरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढत त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्यात आले.
Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैददरम्यान, निगडी पोलीस ठाणे गुन्ह्यातील चेन चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सुमारे 400 ते 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे मुंबईपर्यंत आरोपींचा माग काढण्यात आला. या गुन्ह्यातील फिदा इराणी आणि आदित्य मनलोर यांना निष्पन्न करण्यात आले.
त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिदा इराणी याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 5 सप्टेंबर 2026 रोजी देहूरोड परिसरातून फिदा इराणी याला अटक केली. त्याच्यासोबत त्याचा साथीदार मुकेश नेटके यालाही अटक करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात फिदा इराणी याने त्याचा साथीदार आदित्य मनलोर, तसेच काशिम जाफर हुसेन यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी चेन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 13 ठिकाणी, तर पुणे शहराच्या हद्दीत 2 ठिकाणी, अशा एकूण 15 चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला.
आरोपींकडून लाखोंचे सोने जप्त
या गुन्ह्यांच्या तपासातून 34 लाख 33 हजार रुपये किमतीचे 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. फिदा इराणी याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न तसेच चेन चोरीसारखे गंभीर 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आरोपी मुकेश नेटके याच्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.
इतर दोन आरोपीही पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणातील तालीब बाबा इराणी (वय 31) आणि अली अब्बास शौकत इराणी (वय 28) हे देखील चेन चोरीच्या प्रत्येकी पाच गुन्ह्यांत पाहिजे असल्याचे तपासात समोर आले. या दोघांना 8 सप्टेंबर 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?दरम्यान, आरोपी आदित्य मनलोर हा सध्या रावेत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडे अधिक तपासासाठी ताबा घेण्यात येणार आहे.
2026 मध्ये 32 चेन चोरीचे गुन्हे उघड
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 32 चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये तब्बल 50 लाख 63 हजार रुपये किमतीचे 41 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे शहरातील चेन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा