शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. एकीकडे कोर्टात सुनावणी सुरु आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक दरेगावात गेले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या खटल्याची महत्त्वाची सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. उद्या उर्वरित सुनावणी होणार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवस ते गावी मुक्कामी आहेत. त्यांच्या या अचानक दौऱ्यामागील नेमकं कारण समजू शकलेले नाही. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी तांत्रिक मुद्दे अतिशय मुद्देसूद मांडले. तसेच घडलेल्या घडामोडी सांगितल्या. सिब्बल यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. असं असताना एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकनाथ शिंदे दरेगाव दौऱ्यावर का आले असावेत?
राजकीय वर्तुळातील मिळत असलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवस ते दरे गावी मुक्कामी आहेत. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांशी चर्चा करतील, असे समजते.
ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आली आहे. आजच्या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे विधान केले आहे. पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं, एवढाच प्रश्न असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटात उत्साह संचारला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील
सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरे गाव गाठल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांचा दौरा पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद वाढीसाठी असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
शिवसेना खटल्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
दरम्यान, शिवसेना फुटीला आता चार वर्षे झाले आहेत. या विषयी अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. असं असलं तरी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होत आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष हे वेगळे असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल काय येईल? याबाबत सस्पेन्स वाढला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा