Abhijeet Dipke Security : सीजेपीमुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला झुकवलं. त्यांच्यामागे उभा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या रेट्याने अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण आता दिपके संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी समोर आली आहे.
‘अभिजीतच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार’
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “अभिजीतला भेटायला मी अगोदरच येणार होतो, मात्र त्या वेळी येण्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले असते, म्हणून मी ही भेट टाळली होती. आज अभिजीतला खूप मोठे यश मिळाले असून, तो माझ्याच मतदारसंघातील तरुण आहे. माझ्या मतदारसंघातील एखादा मुलगा राष्ट्रीय स्तरावर एवढं मोठं यश मिळवतो, तेव्हा त्याला भेटणे आणि त्याच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्यच आहे.”
Devendra Fadnavis: पंढरपूरहून अचानक दिल्ली गाठली, महाराष्ट्रात बदलाचे वारे? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला!
पुढे बोलताना शिरसाट यांनी अभिजीतच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, “अभिजीत येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या गावी परत येईल. तो जेव्हा महाराष्ट्रात दाखल होईल, तेव्हा त्याच्या जिवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्याला शासकीय संरक्षण दिले जावे, अशी विशेष मागणी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.”
विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
या आंदोलनाच्या आधारे राजकारण करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधताना शिरसाट म्हणाले, “केंद्र सरकारने अभिजीतच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आणि म्हणूनच त्याला हे यश मिळाले आहे. मात्र, या आंदोलनाच्या आणि अभिजीतच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी व पक्षांनी स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे काम केले.” तसेच, ‘इंडिया’ आघाडीत कसलीही एकवाक्यता नसून, दिल्लीतील आंदोलनाचे श्रेय लाटण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
BJP Politics : शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं दिलं उत्तर
‘१५ वर्षे सोबत काम केले, पण त्यांनी आज उत्तर दिले’ – भगवान दिपके
पालकमंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर अभिजीतचे वडील भगवान दिपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आंदोलनाच्या काळात अनेक नेत्यांनी मला फोन केले, घरी येऊन भेट घेतली. पण ज्यांच्यासोबत मी १५ वर्षे काम केले, तेच पालकमंत्री मला भेटत का नाहीत किंवा फोन का करत नाहीत, असा प्रश्न मला पडला होता. मात्र, त्यांनी आज स्वतः येऊन त्या प्रश्नाचे उत्तर दिले.”
“आंदोलन सुरू असताना मी येथे आलो असतो, तर त्याचे राजकीय भांडवल झाले असते, ही त्यांची भूमिका मला योग्य वाटली. आज ते आमच्या घरी आले, याचा खूप आनंद आहे. अभिजीत दोन-तीन दिवसांत घरी येईल, तो आल्यावरच आंदोलनाची पुढची दिशा आणि भूमिका काय असेल, यावर बोलणे योग्य ठरेल,” असे भगवान दिपके यांनी स्पष्ट केले.
