महेश पाटील, नंदुरबार : निधी वितरणात अन्याय होत असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलून दाखवली. ‘जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असूनही कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळे त्यांना न्याय द्यायचा कसा’? असा सवाल करत शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसमोरच शिंदे शिवसेनेचे आमदार रघुवंशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सत्ताधारी महायुतीतील आमदारालाच जाहीर सभेत रडू कोसळल्याने या प्रसंगाची राज्यभर चर्चा होत आहे.
विकासकामांसाठी निधी मिळत खंत
नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात काल गुरुवारी शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची बाब उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
‘शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही’
यावेळी रघुवंशी यांनी निधी वितरणाच्या बाबतीत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करताना सांगितलं की, “जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या निकषानुसार विधानसभेच्या आमदाराला 20 टक्के निधी, पालकमंत्र्यांना 30 टक्के निधी वितरित करण्यात येतो. आमदारांच्या शिफारशीने पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी द्यावा. जेणेकरून जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळेल. जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. परंतु, सेना लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकास कामे व्हायला पाहिजे, त्यामुळे निधी वितरणाच्या बाबतीत शासनाने फेरविचार करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांचा मित्रपक्षांना इशारा
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केल्यानंतर, ‘शिवसैनिकांच्या जीवावर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आहे. एकीकडे शिवसेना वाढत असताना मात्र मित्र पक्षच जर शिवसैनिकांवर अन्याय करत असेल, तर ते कदापी खपवून घेतलं जाणार नाही’, असा थेट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप व राष्ट्रवादीला लगावलेला आहे. ‘निंदकाचे घर असावी शेजारी’ या म्हणीप्रमाणे शिवसेनेवर टीका करत मग्न रहावं यातच आमचा फायदा असल्याचा टोला देखील दोन्ही मंत्र्यांनी शिवसेना संघटनात्मक मेळाव्यात लगावला.
‘शिवसैनिकांनी काळजी करू नये’
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, “जिल्ह्यात शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेनेची ताकद एक नंबर आहे. शिवसैनिकांनी काळजी करू नये. या जिल्ह्याचे आमदार आहेत, तसंच मी आणि मंत्री गुलाबराव पाटील आहोत. शिवसैनिकांच्या अडीअडचणी, त्यांच्या व्यथा काय आहेत याची जाणीव असून, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ. जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेना वाढवत आहेत. शिवसेना जरी महायुतीत काम करत आहे, तरी मित्रपक्ष शिवसैनिकांवर का अन्याय करत आहे?’ असा सवालही सामंत यांनी यावेळी केला.
‘नंदुरबार काय पाकिस्तानात आहे का?’
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात निधी वितरणाच्या बाबतीत पालकमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केला. याअगोदरच निधी वितरणाचं ठरलं आहे. मी देखील जळगावचा पालकमंत्री असताना त्याठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना निधी देत असतो. नंदुरबार काय पाकिस्तानात आहे काय? असा खडा सवाल उपस्थित करून पालकमंत्र्यांना विधान परिषद आमदारांना निधी द्यावाच लागेल. नियम सर्वांना सारखाच आहे. जे कायदे करणार तेच कायदे तोडणार काय? असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा