मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली होती. या मार्गावर दरड कोसळण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. प्रशासनाने दोन मार्गिका सुरु केल्या आहेत. दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत होईपर्यंत मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन, वळवण्यात आल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मध्य रेल्वेच्या पथकाने कर्जत आणि लोणावळा दरम्यानची ‘दक्षिण-पूर्व डाउन मार्गिका’ आणि ‘मध्य मार्गिका’ यशस्वीरित्या पूर्ववत केल्यानंतर, आता तिसरी मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तिसरी मार्गिका पूर्ववत होईपर्यंत, मध्य रेल्वेने खालील गाड्यांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन किंवा गाड्या वळवणे या उपाययोजनांची मुदत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी दिली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती प्रवाशांना करण्यात आली आहे. लोणावळा – कर्जत विभागातील ढिगारा हटवून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेची टीम आव्हानात्मक परिस्थितीत आणि कठीण भूप्रदेशात अहोरात्र (२४x७) काम करत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
खालील ‘डाऊन’ गाड्या रद्द करण्यात येतील
गाडी क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चेन्नई एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 11041 दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ रोजी
खालील ‘अप’ गाड्या रद्द करण्यात येतील
गाडी क्रमांक 22158 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22731 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस: दिनांक २६.०७.२०२६ रोजी
CJP Protest : सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य, प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारला वेळ हवा
वळवण्यात आलेल्या गाड्या
दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे वळवलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २३.०७.२०२६ ते दिनांक २६.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22102 मदुराई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २४.०७.२०२६ रोजी
गाडी क्रमांक 11018 कारैकाल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २७.०७.२०२६ रोजी.
दौंड – मनमाड – जळगाव – पाळधी – सुरत मार्गे वळवलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20992 दौंड – अजमेर एक्सप्रेस (दिनांक २४.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22193 दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस (दिनांक २६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22718 सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६ आणि दिनांक २७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर – राजकोट एक्सप्रेस (दिनांक २४.०७.२०२६)
दौंड कॉर्ड लाईन – मनमाड – भुसावळ मार्गे वळवलेली गाडी
गाडी क्रमांक 20821 पुणे – संतरागाछी एक्सप्रेस (दिनांक २७.०७.२०२६)
Mumbai Protest : उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, भर पावसात शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांचा महापूर, नव्या पिढीचे ठाकरे बंधू रस्त्यावर
मनमाड – दौंड कॉर्ड लाईन मार्गे वळवलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20822 संतरागाछी – पुणे एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६)
कल्याण – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत)
गाडी क्रमांक 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस – कारैकाल एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६)
सुरत – पाळधी – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 22717 राजकोट – सिकंदराबाद एक्सप्रेस (दिनांक २७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20968 पोरबंदर – सिकंदराबाद एक्सप्रेस (दिनांक २८.०७.२०२६)
गाडी क्रमांक 16613 राजकोट – कोईम्बतूर एक्सप्रेस (दिनांक २६.०७.२०२६)
सुरत – पाळधी – मनमाड मार्गे वळवलेली गाडी
गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६)
शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या
गाडी क्रमांक 11140 होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २४.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ या कालावधीत पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ या कालावधीत खडकी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
शॉर्ट ओरीजनेटेड गाड्या
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ या कालावधीत पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट एक्सप्रेस दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ या कालावधीत खडकी येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा